परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी

0

परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झालीय. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. याचीच नांदी या निवडणुकीत पाहायला मिळालीय. राजकीय वैमनस्य असणारे मुंडे बहीण -भाऊ शिक्षण संस्था आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी स्थानिक नेते पुढे आले. मात्र याचवेळी बहिणीला साथ देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे दोघेही मुंडे बहीण भाऊ या निमित्त एकत्र आले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचं पुन्हा धक्कातंत्र, भुजबळ, राणांचाही पत्ताकट; सलग 12 वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या या नेत्याला राज्यसभेची लॉटरी लागली

२१ पैकी ११ सदस्य पंकजा मुंडे गटाचे
साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात 11 सदस्य पंकजा मुंडे तर दहा सदस्य हे धनंजय मुंडे यांचे निवडून आले. आज अध्यक्ष पदासाठी निवड झाली. यातच पंकजा मुंडे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी नव्या कार्यकर्त्याला संधी दिलीय.

चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड
चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्या. तर कारखान्याच्या हितासाठी आम्ही दोघांनी हा निर्णय घेतल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  शिवराज्याभिषेक दिन! एरंडवणे गणेश नगर, लक्ष्मीनगर भागात 51 गणपती मंडळांनी उभारली शिवकश राजदंड स्वराज्य गुढी

काही दिवसांपूर्वी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत या मुंडे बहीण भावाची युती दिसून आली. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आली. आता हेच समीकरण आगामी काळात पाहायला मिळतं का हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

पुन्हा एकत्र येणार का?
11 संचालक पंकजा मुंडे तर 10 संचालक धनंजय मुंडे यांचे बिनविरोध निवडून आले. धनंजय मुंडे यांच्या कडून चंद्रकांत कराड यांच्या सारखा अतिशय नवा चेहरा देण्यात आला. आता इथून पुढे जे राजकीय वैर महाराष्ट्रने पहिला ते आगामी काळात पुन्हा हे दोघे बहीण भाऊ एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अधिक वाचा  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेत आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या १२.७१ लाख शेतकऱ्यांना फटका