Mohan Bhagwat Statement: मोहन भागवतांचे मोठं वक्तव्य, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले ?

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) रविवारी हरियाणातील
कर्नाल येथे पोहोचले. येथे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारतात ब्रिटीश राजवटीपूर्वी आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेत 70 टक्के लोकसंख्या शिक्षित होती आणि येथे बेरोजगारी नव्हती. ते पुढे म्हणाले की, ‘त्याच वेळी इंग्लंडमधील केवळ 17 टक्के लोक शिक्षित होते. भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी आपली शिक्षणपद्धती म्हणजेच 70 टक्के लोकांना शिक्षित ठेवण्याची पद्धत मोडीत काढली. आपली शिक्षण व्यवस्था इथे राबवली आणि आपली शिक्षण व्यवस्था भारतात आणली. मोहन भागवत म्हणाले की, ‘ब्रिटिशांच्या त्या शिक्षण पद्धतीमुळे आपण 17 टक्के साक्षर राहिलो आणि ते 70 टक्के शिक्षित झालो. हे इतिहासाचे सत्य आहे. ते म्हणाले की, आपल्याकडे जी शिक्षण व्यवस्था होती. त्यात शिक्षक शिकवायचे. सर्वांना शिकवायचे. जाती-जाती असा भेद नव्हता. माणूस स्वत:चे जीवन जगू शकतो, शिक्षणही सर्वांना उपलब्ध होते.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

हेही वाचा

Land for Job Scam: जमीन घोटाळ्याप्रकरणी CBI चे पथक पोहोचले राबडीदेवींच्या घरी; लालू कुटुंबीयांची चौकशी सुरू ते म्हणाले की, शिक्षक गावोगावी जाऊन शिकवायचे. त्यांनी पोट भरण्यासाठी शिकवले नाही, कारण शिकवणे हे त्यांचे काम आहे. शिकवणे हे त्यांचे कर्तव्य आणि धर्म होते. आजकाल आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की प्रत्येक माणूस शिक्षण आणि आरोग्यासाठी काहीही करायला तयार आहे, कारण या दोन्ही गोष्टी अत्यंत महाग आणि दुर्मिळ झाल्या आहेत. आज या दोन्ही गोष्टी व्यवसायाप्रमाणे केल्या जात आहेत. शिक्षण आणि आरोग्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, पूर्वी या गोष्टींकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात नव्हते.

अधिक वाचा  भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी आनंद अन् चिंतेची बातमी समोर; यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला भाव कोणावर संकट?