डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही स्वाभिमानाची घामातून साजरी करा देणग्याच्या गुलामगिरीला निमंत्रण देऊ नका – भगवान तांबे

0

मुंबई दि. ६ (रामदास धो. गमरे) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती करून या देशातील तळागाळातील वंचित, मागास वर्गाला, गुलामांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ज्ञान देऊन दृष्टी दिली, लुळ्या पांगळ्यांना उभे राहण्याची शक्ती दिली या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी त्यांनी आपल जीवन अर्पण केल. सोबतच आपल्या ९ कोटी लेकरांच्या भविष्यासाठी त्यागमूर्ती माता रमाईने बाबासाहेबांना साथ दिली, बाबासाहेबांना झळ पोहोचू नये म्हणून कुटुंबाचा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांनी संसाराचा गाडा एकहाती सुरळीत चालवला परिस्थिती गरिबीची असल्याने वेळप्रसंगी लेकरांच्या औषध-पाण्यासाठी पैसे नसल्याने पोटच्या चार मुलांना मातीआड केलं अशी त्यागमूर्ती माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्नाचा वाढदिवस गेली अकरा वर्षे सलग दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाच्या वतीने अविरत सुरु आहे परंतु या कार्यक्रमासाठी आपण कोणाकडूनही पाच पैसे देणगी घेत नाही कारण देणगी घेतल्यानंतर आपल्याला त्यांची मन सांभाळून कार्यक्रमाची आखणी करावी लागते, त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम करावा लागतो ते सांगतील त्याप्रमाणे नियोजन कराव लागत म्हणजे थोडक्यात आपण त्यांचे मानसिक गुलाम होतो म्हणून आपण कोणाचीही पाच पैसे देणगी न घेता समाज बांधवांच्या लोकवर्गणी मधून कार्यक्रम साजरा करतो, आपल्या समाज बांधवांच्या घराघरात जाऊन त्यांच्याकडून वर्गणी गोळा करून आपण माता रमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र लग्न सोहळा साजरा करतो, ज्याप्रमाणे दीक्षाभूमी, चैत्यभूमी आहे त्याचप्रमाणे भायखळा मच्छीमार्केट ही बाबासाहेबांची लग्नभूमी आहे व ते महत्व त्या भूमीस प्राप्त झाले पाहिजे अशी यामागची भूमिका आहे म्हणून मी आपणांस विनंती करतो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई या आपल्या माता पित्याची जयंती आपण साजरी करत असताना ती आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशातून स्वाभिमानाने साजरी करा, वर्गणी-देणग्या घेऊन पुन्हा गुलामगिरीला निमंत्रण देऊ नका” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत असताना अध्यक्ष भगवान तांबे यांनी केले.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांचा १२० वा मंगलपरिणय सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी भायखळा मच्छी मार्केट याठिकाणी अध्यक्ष भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर बा. मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सादर केले. सदर कार्यक्रमास माजी आमदार व नगरसेविका यामिनी जाधव, आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर, नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर, सम्राट वृत्तपत्राचे संपादक कुणाल बबन कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, व्यवस्थापक मंडळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी ही आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार

सदर मंगलपरिणय सोहळ्या निमित्त सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र च्या वतीने भीमगीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला, त्याचबरोबर दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या बक्षिसांचे वितरण ही सदर प्रसंगी करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचा अहवाल ही त्याच दिवशी सादर करण्यात आला.

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या अध्यक्ष भगवान तांबे, सरचिटणीस अनुराधा साळवे, खजिनदार मोहन मर्चंडे, उपाध्यक्ष शांतू डोळस, सिद्धार्थ कांबळे, सुरेश कांबळे, अशोक केदारे, रवींद्र कांबळे, श्रीधर जाधव, शांताराम कोळगे, सचिव नागेश जाधव, दीपक क्षीरसागर, दिनेश घोडके, मीनाक्षी सकपाळ, सुमती कांबळे, संदीप धोत्रे, दीपक तांबे, सुमेध सुर्वे, आशिष जाधव, प्रदीप सकपाळ, उपखजिनदार मनोहर मोरे, हिशेब तपासनीस नितीन जाधव व उपस्थितांचे आभार मानून नागेश जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  बारामती कुटुंबाची ‘घालमेल’ एन ‘चमकोगिरी’ची कसोटी; बुथवरचे मताधिक्य कार्यकर्त्यांचा खरा चेहरा उघड करेल