राज्यात जनगणनेचा बिगुल वाजला! ‘ॲप’द्वारेही नोंदणी प्रगणक प्रशिक्षण वेळापत्रक जाहीर; सेवाभाव प्रतिज्ञा अनिवार्य

0

देशात कोरोना काळामुळे जनगणना लांबली होती. त्याची प्रक्रिया आता सूरू झाली आहे. हे सर्वात महत्वाचे कार्य म्हणून सर्व त्या पातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील आगामी जनगणना-२०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकामुळे राज्यातील जनगणना प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक होण्याची चिन्हे आहेत.

परिपत्रकानुसार कालावधी असा

  • २३ एप्रिल ते ८ मे २०२६
  • ( राज्यभरात ४ ते ५ प्रशिक्षण बॅचेस आयोजन) प्रत्येक बॅचमध्ये ४० ते ४५ प्रशिक्षणार्थी मर्यादा ५०.
  • दोन फील्ड ट्रेनर्सची ( Field Trainers ) टीम प्रत्येक बॅचचे प्रशिक्षण देणार असून, प्रत्येक टीमकडून किमान चार बॅचेस हाताळल्या जाणार आहेत.
  • या वर्षी प्रशिक्षणास कॅस्केड पद्धतीचा अवलंब
  • आधी फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण त्यानंतर ते प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करतील.
  • या प्रशिक्षणात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही सत्रांचा समावेश आहे.
अधिक वाचा  ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणार; उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव;  धरण उणे २१ टक्के, पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

विशेषतः मोबाईल अॅपद्वारे डेटा संकलन, माहितीची पडताळणी आणि घराघरांत जाऊन प्रभावी संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे.

नोंदणी बंधनकारक

जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली (CMMS) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रशिक्षण बॅचेस तयार करणे, उपस्थिती नोंदविणे आणि माहितीचे व्यवस्थापन या सर्व प्रक्रिया CMMS द्वारे पार पडणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. प्रशिक्षणासाठी निवडलेल्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, तसेच दर्जेदार भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय, प्रशिक्षणाच्या सुरुवातीला व शेवटी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य ठेवण्यात आली असून, प्रशिक्षणार्थ्यांकडून अभिप्राय घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘सरकारचे जरांगे पाटलांकडून ब्लॅकमेलिंग, सरकार गेल्या 3 वर्षांपासून दबावापुढे गुडघे टेकताना दिसत आहे ‘ आता कुणबी सेना मैदानात

सेवाभाव प्रतिज्ञा

महत्त्वाचे म्हणजे, जनगणना प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता टिकवण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांकडून ‘सेवा भाव’ प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. नागरिकांकडून माहिती गोळा करताना गोपनीयता राखणे आणि निष्पक्षपणे काम करणे यावर या प्रतिज्ञेत भर देण्यात आला आहे. एकूणच, शासनाच्या या व्यापक तयारीमुळे जनगणना-२०२७ अधिक डिजिटल, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.