अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला.उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आता सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि जय पवार देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 40 मिनिटं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी 30 मिनिटं चर्चा केली. या भेटीवर आता अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी या बैठकीसंदर्भात ट्विट केलं आहे.






नेमकं काय म्हणाले अमित शाह?
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली. आपल्या सर्वांचे प्रिय असलेले अजित पवार यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढणं सोपं नाहीये, मात्र लोकांचं कल्याण आणि राज्याचा विकास हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा संकल्प महत्त्वाचा असेल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे, सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 मिनिट चर्चा केली. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपीसोबत आहोत अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजप कायम सोबत असेल असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे, तसेच त्यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक देखील व्यक्त केला आहे.











