अजित पवारांच्या वक्तव्यावर मनसेचं प्रत्युत्तर “स्वत:च्या जीवावर लढावं आणि मग बोलावं, भाजपचा पदर धरून…”

0

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा राज्याच्या राजकारणात अजूनही सुरू आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांसोबतच अनेक राजकीय नेतेही या निकालावर आश्चर्य व्यक्त करताना दिसले आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावर आश्चर्च व्यक्त केलं होतं. अजित पवार यांना एवढ्या जागा मिळाल्या असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याला मनसेतून सडेतोड उत्तर मिळाल्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला काय घेणंदेणं? आम्हाला लोकांनी निवडून दिलं. आम्हाला जनतेने निवडून दिलं. लोकसभेला महायुतीला 17 जागा मिळाल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नव्हतो. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही गप्पा मारता. मलाही मुलाला, पत्नीला निवडून आलं नव्हतं. जनतेने जो कौल दिला तो मान्य केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता अमित ठाकरे आणि मनसे नेत्यांकडून उत्तर आलं आहे.

अधिक वाचा  प्रशांत महासागर ‘एल निनो’च्या सक्रियतेचा मोठा फटका; यंदा सरासरीपेक्षा ६६ % पाऊस; महागाई वाढण्याचा धोका

“भाजपचा पदर धरल्यामुळे अजित पवारांना…”

अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे म्हणाले, त्यांचाही मुलगा, पत्नी निवडून आले नव्हते. अजित पवार यांनी भाजपशी लग्नगाठ बांधल्यामुळे त्यांना मत मिळालं. भाजपचा पदर धरल्यामुळे आम्हाला मतदान नाही, तर राज ठाकरे यांच्या नावावर मतं पडली आहे. अजित पवार यांनी स्वत:च्या जीवावर उभं राहावं आणि मग या सगळ्या वल्गना कराव्यात.

अजित पवारांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे काय म्हणाले?

अजित पवार यांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे म्हणाले, मी लहान आहे. त्यांना राजसाहेबच उत्तर देतील. पण मी या निवडणुकीत भरपूर शिकलो आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीवरुन नाही, तर शेवटच्या निवडणुकीवरुन माझ्याबद्दलचं मत तयार करा. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, EVM आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं 2017 मध्ये राज ठाकरे ममता बॅनर्जी यांच्यासह सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटले होते आणि म्हणाले होते की EVM वर विश्वास नसेल तर त्यावर बहिष्कार टाका. अमित ठाकरे म्हणाले, निवडणुका बॅलट पेपरवर घेतल्या जाव्यात ही आमची जुनी मागणी आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार