महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीची सरकार स्थापन झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर आता सर्वांचे लक्ष महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. माहितीनुसार, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार 12 डिसेंबरला होणार आहे.






महाराष्ट्रात मुख्यमंत्रीसह मंत्रिपरिषदांची एकूण संख्या 43 आहे. महायुती पहिल्या टप्प्यात 30 मंत्रीचा शपथविधी करणार आहे. यामध्ये भाजपाला मुख्यमंत्रीसह -15 शिवसेना (शिंदे) ला 8 आणि एनसीपी (अजित पवार) ला 7 मंत्रीपद मिळू शकतात. माहितीनुसार कॅबिनेट विस्तारात सुमारे 30 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. यात भाजपकडून 15, शिवसेना (शिंदे) कडून 8 आणि एनसीपी (अजीत पवार) कडून 7- आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते.
कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार
माहितीनुसार भाजपकडे गृह, विधी आणि न्याय, गृहमंत्री निर्माण, ऊर्जा, राज शिष्टाचार, सिंचन, ग्राम विकास, पर्यटन, महसूल, कौशल्य विकास, सामान्य प्रशासन आणि आदिवासी विभाग असू शकतात.
याशिवाय राष्ट्रवादी (अजीत पवार)ला अर्थ आणि नियोजन, अन्न आणि पुरवठा, FDA, कृषी, महिला आणि बाल विकास, खेळ आणि युवा कल्याण आणि मदत आणि पुनर्वसन विभाग मिळू शकते. तर शिवसेना (शिंदे)ला शहरी विकास, अबकारी, सामाजिक न्याय, पर्यावरण, खाण, जल पुरवठा, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दिले जाऊ शकते.
भारतीय जनता पक्ष गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवणार आहे. एकनाथ शिंदे यांना शहरी विकास विभाग दिला जाऊ शकतो. तर अजित पवार अर्थ खातं मागत आहेत, पण देवेंद्र फडणवीस गृहासोबत अर्थ विभाग देखील ठेवू इच्छित आहेत.भाजप या विभागावर अजित पवारांशी चर्चा करणार आहे. भाजपा याच्या बदल्यात अजित पवारांना ऊर्जा किंवा हाउसिंग विभाग देऊ इच्छित आहे. याशिवाय शहरी विकास, महसूल, आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बाल विकास विभागावर सध्या चर्चा सुरू आहे. काही विभाग एकमेकांमध्ये बदलले जाणार आहे.











