आमच्याविरोधी फेक न्यूरेटीव्ह सेट केला निवडणुका आता उन्हाळ्यात होणार नाहीत, निवडणूक आयुक्तांचा निर्णय

0

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच निवडणूक यंत्रणांनी चांगली कामगिरी केली. यामुळे जगतिक स्तरावर अनेक विक्रम तयार झाले. परंतु या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या. निवडणूक रणरणत्या उन्हात घेतली गेली. यापुढे महिनाभर आधी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच आमच्याविरोधात फेक न्यूरेटीव्ह राबवण्यात आले. त्यावर आम्ही काहीच करु शकलो नाही, असे निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. यावेळी जम्मू-काश्मीरमध्येही लवकरच निवडणुका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या बाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघायला नको अशी आमची भूमिका होती, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  राज्यातील ‘शेतकरी कर्जमाफी’ परदेशी समिती अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, या नियम-अटी आणि शिफारशी?

जम्मू-काश्मीरमध्ये लवकर निवडणुका

जम्मू काश्मीरमधे ५८.५८ % मतदान झाले. त्या ठिकाणी अनेक रांगा मतदानासाठी दिसल्या. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी आता आम्ही लवकरच मतदान घेणार आहोत. मणिपूरमध्ये ९४ स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते. ही आमच्यासाठी सक्सेस स्टोरी आहे. २ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता या निवडणुका झाल्या आहेत. यापूर्वी निवडणूक दरम्यान किती हिंसाचार होतात, हे आपण पाहिले होते. परंतु या निवडणुका शांततेत झाल्या आहेत. पैसे, दारू वाटल्याच्या घटना घडत होत्या. यावेळी एकही मोठी घटना समोर आली नाही.

४३९१ कोटींच ड्रग्स

अधिक वाचा  भारत जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश बनला; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, ‘या’ शहरात सर्वाधिक श्रीमंत

४३९१ कोटींच ड्रग्स या काळात आम्ही जप्त केले आहे. निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी १३५ ट्रेन सुरु होत्या. त्या ट्रेन निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जात होत्या. तसेच १६९२ हेलिकॉप्टरने कर्मचारी पोहोचविले जात होते. देशातील असा कुठलही कोपरा नाही की ज्या निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत.

बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान झाले. त्या ठिकाणी हिंसाचार झाला नाही. मणिपूरमध्येही शांततेत मतदान प्रक्रिया झाली. जम्मू काश्मीरमध्ये आशादायक चित्र आहे. या ठिकाणी लोकांचा लोकशाहीवर विश्वास दिसला. त्यामुळे लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये लवकर निवडणूक होणार आहे. आयोग लवकरच या ठिकाणी निवडणूक घोषीत करण्यात आले.

अधिक वाचा  काँग्रेससाठी दिलासादायक वृत्त! प्रवक्ते होण्यासाठी प्रथमच तब्बल 5000 प्रज्ञावंतांचे अर्ज; २५० इच्छुकांच्या मुलाखती लवकरच घोषणा