रिक्षा-टॅक्सी चालक मराठी भाषा अनिवार्य; फडणवीसांची पुन्हा सावध भुमिका; देशात कोणावर भाषा सक्तीकरुन…

0

आगामी महाराष्ट्र दिन 1 मेपासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर सरकारमधील शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच संजय निरुपम यांनी काल दहीसरमधील रिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून होता. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि वातावरण शांत केलं. या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, “साहेबांचे आशीर्वाद माझ्यासह बारामतीकरांसाठी लाखमोलाचे…”; प्रकृतीसाठीही प्रार्थना

रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, मराठीला प्राधान्य देणे आणि या भाषेचा प्रचार करणे यात काहीही चुकीचे नाही. पण यावरुन वाद होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. तसेच ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी भाषा शिकवली जाईल. कारण देशात कोणावरही कोणतीही भाषा सक्तीकरुन हिंसा करणे हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांना मराठी शिकता यावी यासाठी आम्ही प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत कोणावरही कोणताही अन्याय होणार नाही, याचीही आम्ही पूर्ण काळजी घेऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  पाण्याअभावी पुणे हैराण! पुण्यात दुसऱ्या दिवशीही पाणी नाही; महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका