पोलीस दलाच्या जवानाचाच धावत्या रेल्वे गाडीत गोळीबार, चौघांचा मृत्यू; काय घडलं?

0

वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच जयपूर-मुंबई पॅसेंजर रेल्वे गाडीत अंदाधूंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस दलाच्या जवानानेच हा गोळीबार केला असून, यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन प्रवासी असून, एक रेल्वे पोलीस दलाचा अधिकारी आहे.

मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात ही घटना घडली. जयपूरवरून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेत गाडीत सुरक्षा जवानानेच अंदाधुंद गोळीबार केला. चेतन असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव असून, तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. गोळीबार करण्यात आला, तेव्हा रेल्वे गाडी वापी ते बोरिवली स्टेशनच्या दरम्यान होती.

अधिक वाचा  भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी आनंद अन् चिंतेची बातमी समोर; यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला भाव कोणावर संकट?

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं?
सोमवारी (31 जुलै) जयपूर एक्स्प्रेस मुंबईकडे (ट्रेन नंबर 12956) येत होती. याच दरम्यान, बोगी क्रमांक बी 5 मध्ये पहाटे 5.23 वाजता ही घटना घडली. गोळीबार करणारा आरपीएफ जवान चेतन आणि एएसआय अधिकारी हे गाडीतून प्रवास करत होते. त्याचवेळी चेतनने एएसआयवर गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराने प्रवाशी घाबरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. बोगी क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या चेतनने प्रभारी एएसआय टीका राम यांच्यावर गोळी झाडली.

अधिक वाचा  सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत?

गाडी बोरिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात एएसआय टीका राम आणि तीन रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी केली. दरम्यान, गोळीबार करणारा आरोपी चेतनला अटक करण्यात आली आहे.