“गोवंश कायद्याच्या कचाट्यात शेतकरी! शिरूर तालुक्यातील गावागावात वासरं रस्त्यावर सोडण्याचे प्रकार वाढले”

0

राज्यातील गोरक्षणासाठी लागू असलेल्या महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा 1976चा उद्देश चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीमुळे तळागाळातील शेतकरी मात्र मोठ्या अडचणीत सापडला आहे, कायद्यानुसार गाय, बैल आणि वासरु यांची कत्तल, विक्री आणि कत्तलीसाठी वाहतूक पुर्णपणे बंदी आहे.यामुळे वासरु मोठे झाल्यावर त्याचा शेतीसाठी उपयोग नसताना व विक्रिला परवानगी नसल्याने सांभाळण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला नाही…. तांदळी ता शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नवजात वासरु रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा गावाबाहेरील माळरानावर सोडून देण्याच्या घटना वाढल्या आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून तांदळी गावात व आजूबाजूच्या परिसरात 3-4 किमी परिसरात किमान 8/10 वासरं बेवारस अवस्थेत आढळून आले आहेत. त्यापैकी काही वासरं रस्ता ओलांडताना जखमी होत आहेत आणि ऊन्हा-पाऊसामुळे मरण पावत आहेत याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे रात्रीच्या वेळी रस्त्यावर येणाऱ्या बेवारस जनावरांमुळे तांदळी- मांडवगण रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे भटकी कुत्री या वासरांवर हल्ला करतात त्यामुळे प्राणी क्रुरता देखील वाढली आहे. तरी बेवारस जनावरे सोडणाय्रांवर कठोर कारवाई करतानाच त्यांना योग्य पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येण गरजेचे आहे.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

या प्रश्नाकडे जिल्हा अधिकारी पुणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीशिरूर/ पुणे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी श्री फत्तेसिंग गदादे व संतोष भाऊसाहेब कळसकर यांनी केली आहे