उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या विधानाने ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याची चर्चा करणाऱ्या पाच खासदारांची धाकधूक वाढवली आहे. ओम राजेनिंबाळकर यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की, माझ्या दृष्टिने पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल महत्त्वाचा आहे. 20 जूनला या प्रकरणाचा मुंबई हायकोर्टात निकाल लागणार आहे. हा निकाल लागल्यानंतर याबाबत बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. शनिवारी पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना ओम राजेनिंबाळकरांच्या विधानाने पाच खासदारांची धाकधूक वाढवली आहे.






यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले की, ‘मी येत्या दोन दिवसातच धाराशिव मतदारसंघात जाणार आहे. त्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहे. त्यानंतर भविष्याकाळातील राजकीय वाटचालीविषयी अंतिम निर्णय घेणार आहे. ‘ असे विधान करीत ओम राजेनिंबाळकरांनी ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी असलेल्या सोबतच्या पाच खासदारांची धाकधूक वाढवली आहे.
त्यामुळे येत्या काळात ऑपरेशन टायगर धोक्यात आले असल्याची चर्चा रंगली आहे. पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना येत्या दोन दिवसात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यासोबाबतच यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना अजूनही मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असून मी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसात मतदारसंघातील नेत्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुन्हा एकदा हे तळ्यात-मळ्यातचे वक्तव्य करीत सस्पेन्स वाढवला आहे.
दुसरीकडे त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी देखील ओम राजेनिंबाळकर येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगत आणखीनच सस्पेन्स वाढवला आहे. शिंदे सेनेसोबत जाण्यास ओम राजेनिंबाळकर तयार होते मात्र त्यांनी 20 जूनला निकाल लागल्यानंतर निर्णय घेईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता ओम राजेनिंबाळकर येत्या दोन दिवसात काय निर्णय घेणार याबाबतचा सस्पेन्स वाढविला आहे. त्यामुळे आता पाच खासदारांची धाकधूक वाढली आहे.













