गल्ली ते दिल्ली सत्तेची समीकरणे जुळवणाऱ्या राजकीय लोकांना ‘कोथरूड!’ म्हटलं की भल्या भल्या कल्पना रंगवल्या जात असल्या तरी सुद्धा याच कोथरूडच्या नसानसात कष्टकरी आणि राबणारे हातांचे जीर्ण वास्तव्य बदलण्यासाठी गेली 15 वर्ष या भागामध्ये काम करणारा रामचंद्र कदम नावाचा ‘शेठ’ माणूस आपल्या पुरोगामी विचारांची कास धरून आता संपूर्ण पुणे शहरात सक्रिय झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री व एक खासदार अशी भक्कम फळी आणि आजूबाजूला सर्वत्र नगरसेवक अशी भक्कम फळी कोथरूडच्या प्रतिगामी विचाराच्या विरोधात गेली 15 वर्षे भक्कम लढा देणारा काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून गोरगरीब जनतेच्या सेवार्थ जगणारे चंदूशेठ कदम सध्या पुणे महापालिका गटनेते म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय झाले असून शहरभर जनआंदोलन जनसंवाद आणि सार्वजनिक कार्यक्रम अशा तिहेरी सूत्रांचा आधारावर पुरोगामी विचाराची पताका अभिमानाने फडकवत आहेत. अशा या बहुगुणी नेतृत्वास ‘लोकायत’न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!






कोथरूडमध्ये प्रतिगामी विचाराचा सर्वत्र बोलबाला असला तरी सुद्धा कोथरूडच्या एका भागामध्ये पुरोगामी विचाराची भक्कम विचारधारा विकसित करण्यामध्ये यश मिळालं ते फक्त गोरगरिबांचा हक्काचा आधार आणि जिव्हाळ्याची नाळ रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्यामुळेच! पुणे शहराचे राजकीय केंद्र म्हणून आज कोथरूडचा उदय होत असताना या भागातील पुरोगामी नेतृत्वही तेवढे जिव्हाळ्याचं स्नेहाच आणि समाजसेवी वारश्याच बनतय! वरकरणी प्रतिगामी विचारसरणीचा भाग म्हणून कोथरूडची ओळख असली तरी पुणे महापालिकेचे सभासद म्हणून ‘हॅट्रिक’ साजरी करणाऱ्या या नेतृत्वाने भक्कम हाताने फक्त समाजसेवी वारसा जतन केला आहे. म्हणूनच आज प्रभाग क्रमांक 11ची अनोखी नाळ रामराज्य विचाराचे आणि चंद्रछायेची शितलता देणारे भक्कम समाजसेवी वारशाचे ‘हात’ म्हणून अँड. चंदूशेठ कदम यांच्याकडेच पाहिले जाते.
कोथरूड भागामध्ये माजी नगरसेवक कै. सुबराव कदम यांनी काँग्रेस विचाराची जी स्नेहवेल लावली होती त्या विचारांची जपणूक करत काँग्रेस विचाराचे जतन करून कठीण परिस्थितीमध्ये याच विचाराची वाढ करण्यासाठी अहोरात्र जनसेवेच्या व्रतामध्ये गुंतलेले हात म्हणून रामचंद्र कदम यांच्याकडे पाहिले जाते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा कार्यकर्त्यांवर (ओलाव्याची आणि मायेची) चंद्रछाया निर्माण करणे; जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रामराज्य संकल्पनेचे जनजीवन बनवण्यासाठी पुणे महापालिकेचे गटनेते चंदू शेठ कदम आजही अहोरात्र काम करत आहेत. प्रभाग 11 मधील सुतारदरा किष्किंधानगर जयभवानीनगर म्हातोबानगर व केळेवाडी या वस्ती विभागातील नागरिकांसाठी विभिन्न योजना आणि या भागातील मुलींचे आणि तरुणांचे प्रश्न शैक्षणिक समस्या आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत नगरसेवक आणि नागरिक यांची वेगळीच नाळ चंदू शेठ कदम यांनी निर्माण केली आहे. राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांनी या भागावर आपली पकड मिळवण्यासाठी आज अतोनात प्रयत्न केले तरीही नागरिक आणि लोकप्रतिनिधींची अनोखी नाळ आजवर सलग चौथ्यांदा वृद्धिंगतच होत जाणे हे चंदूशेठ कदम यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.
लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक कोणतीही असो ‘हॅट्रिक’ नगरसेवक पुणे महापालिकेचे विद्यमान गटनेते रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम यांचा दृढसंकल्प काँग्रेस पक्षाचे विचार आणि प्रचार करण्यासाठी कायमच फायद्याचे झाले असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीत चंदुशेठ कदम यांनी विरोधी पक्षातून प्रबळ स्थानिक उमेदवार असतानाही उत्साहवर्धक आणि समाधानकारक वातावरण बनवण्यात यश मिळवलं होतं. पुणे महापालिका काँग्रेस नगरसेवक म्हणून गेली 16 वर्षे नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी काम करत आहेत.
प्रभाग ११मध्ये एक आश्वासक चेहरा आज ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडे पाहिले जात असून वस्ती विभागात आजवर केलेली कामे हीच त्यांची जमेची ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रतिगामी विचाराच्या राजकीय विरोधकांकडून हाच जनआशीर्वादाचा अभेद्य भेद गड भेदण्यासाठी जंग जंग पछाडले तरीसुद्धा 2 दशकांची घट्ट विणलेली ही नाळ जराही क्षीण न होणे ही खरी विचारांची आणि स्नेहबंधाची ताकद आहे. भक्कम पुरोगामी विचारांची बांधणी असलेल्या या नेतृत्वाला मात्र आपल्या मतदारांवर प्रचंड प्रचंड विश्वास असून पुन्हा सेवेची संधी दिल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे या वाढदिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आह.













