तामिळनाडूत मुख्यमंत्र्यांसह 34 पैकी 31 मंत्री पिछाडीवर, विजय थलपतीच्या TVK ची भक्कम ‘सेंच्युरी’ घोडदौड

0

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक कल हाती येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्याभोवती फिरणारे तामिळनाडूचे राजकारण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाने निवडणुकीत प्रस्थापितांना पाणी पाजले असून, राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री सध्या पिछाडीवर आहेत.

मंत्रिमंडळाला मोठा धक्का

सुरुवातीच्या कलानुसार, तामिळनाडूच्या राजकारणात कधीही न पाहिलेले चित्र दिसत आहे. सत्ताधारी द्रमुक सरकारमधील दिग्गज चेहरे आणि स्वतः मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तसेच त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन पिछाडीवर असल्याचे समजते. 34 मंत्र्यांपैकी 31 मंत्री पिछाडीवर असल्याने द्रमुकच्या गोटात शांतता पसरली आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारची टेलिग्रामवर NEETसाठी बंदी; पुन्हा ‘या’ तारखेला होणार सुरू; ही बंदी मात्र ३० जूनपर्यंत कायम

थलपती विजय यांची ‘सेंच्युरी’

एक्झिट पोलमध्ये ‘अॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. थलपती विजय यांच्या TVK पक्षाने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत बहुमताच्या आकड्याकडे (118) वेगाने धाव घेतली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा एखादा पक्ष थेट सत्तेच्या जवळ पोहोचण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ ठरण्याची शक्यता आहे.

 

सध्याचे पक्षनिहाय बलाबल (कल)

टीव्हीके (TVK): १००+ जागांवर आघाडी

अ. द्रमुक + भाजप आघाडी: ६५ जागांवर आघाडी

द्रमुक + काँग्रेस आघाडी: ५२ जागांवर आघाडी

इतर: २ जागांवर आघाडी

राजकीय समीकरणे बदलणार?

तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतदान झाले असून बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. सध्याचे कल पाहता थलपती विजय यांचा पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माई इंडियाच्या एक्झिट पोलने 98 ते 120 जागांचा अंदाज दिला होता, जो आता वास्तवात उतरताना दिसत आहे. दुसरीकडे, पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या AIADMK आणि भाजप आघाडीलाही अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. आज दुपारपर्यंत तामिळनाडूतील अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  कालवा समितीच्या सर्व बैठकांचे वृत्तांत जाहीर करा पुण्यातील पाणीटंचाई ही मनुष्यनिर्मित: माजी नगरसेवकांचा गंभीर आरोप