‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!

0

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. नितीश कुमार हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तब्बल २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री पद नितीश कुमार यांनी सांभाळले.आता बिहारची सुत्रे सोडून नितीश कुमार दिल्लीत जाणार आहेत. सर्वाधिक काळ बिहारचा मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांनी मिळवला. आता नितीश कुमार हे डॉ. श्रीकृष्ण सिंह, कर्पुरी ठाकुर आणि लालू प्रसाद यादव यांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. रस्ते, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या जोरावर त्यांनी बिहारचे चित्र बदलले, पण त्यांच्या ‘पल्टीमार’ प्रतिमेचीही मोठी चर्चा झाली. त्यांच्या कारकिर्दीचा हा विशेष आढावा. नितीश कुमार आणि बिहार काय समीकरण आहे? बिहारी लोक नितीश कुमारांकडे कसे पाहतील? याबाबत सविस्तर माहिती…….

जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून १९७४ मध्ये नितीश कुमार पुढे आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे सोबती असलेले लालू प्रसाद यादव अवघ्या २९ व्या वर्षी खासदार झाल्याचे पाहिले. तसेच प्रसिद्धीच्या झोतात नसलेले मिथिलेश कुमार सिंह हे आमदार झालेले पाहिले. १९७२ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेल्या नितीश कुमार यांनी पूर्णवेळ राजकारणात पडण्याचा निर्णय घेतला. १९८५ पर्यंत पराभवाने नितीश कुमार यांची साथ सोडली नाही. अखेर १९८५ मध्ये ते हरनौतमधून आमदार झाले. परंतु, तोपर्यंत समाजवादी नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या राजकारणात जम बसवला होता. १९९० ते २००५ पर्यंत बिहारच्या राजकारणावर लालूंचा प्रभाव होता. याच पंधरा वर्षांत नितीश कुमार यांनी सात दिवसांचे मुख्यमंत्रीपद मिळवले. ही त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीसाठी गरूडझेप ठरली. बिहारच्या राजकारणात लालूंचा प्रभाव होता. त्यामुळे स्वत:चे राजकीय महत्व कायम ठेवण्यासाठी नितीश कुमार यांनी दिल्लीत वेळ व्यतीत केला.

नितीश कुमार यांनी आज (मंगळवार) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन २० वर्षांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द संपवली. सर्वाधिक काळ बिहारचा मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांनी मिळवला. आता नितीश कुमार हे डॉ. श्रीकृष्ण सिंह, कर्पुरी ठाकुर आणि लालू प्रसाद यादव यांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. सिंह यांना अनेकदा “आधुनिक बिहारचे जनक” म्हटले जाते. त्यांनी बिहारमध्ये कारखाने आणि शैक्षणिक संस्था आणल्या. कर्पुरी ठाकुर हे सामाजिक न्यायासाठी ओळखले जातात. ओबीसी, इबीसी आणि अनुसूचित जातींचे सशक्तीकरण करण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या सामाजिक न्यायाचे मॉडेल पुढे नेल्याचे म्हटले जाते. लालूंच्या काळात काँग्रेसमधील उच्चवर्णीयांकडून सत्ता ओबीसींच्या हातात गेली. ओबीसी राजकारण आजही बिहारमध्ये प्रभावी ठरते, त्याचे श्रेय लालूंना दिले जाते. आता प्रश्न असा की, दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांना बिहारमध्ये कसे ओळखले जाईल? पुढील पाच गोष्टींसाठी नितीश यांना बिहार लक्षात ठेवू शकतो.

अधिक वाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही स्वाभिमानाची घामातून साजरी करा देणग्याच्या गुलामगिरीला निमंत्रण देऊ नका – भगवान तांबे

इन्फ्रास्ट्रक्चर मॅन

खड्ड्यांचे साम्राज्य असलेले रस्ते आणि मोडकळीस आलेल्या शाळा व रूग्णालयाच्या इमारतींसाठी बिहार ओळखले जात. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात २००५ ते २०१० दरम्यान रस्ते व पूल उभारण्यावर भर दिला. तर दुसऱ्या कार्यकाळात २०१० ते १०१५ दरम्यान शाळा, रूग्णालये आणि सरकारी कार्यालये बांधण्यावर जोर दिला. त्यांनी बिहारमध्ये काही वास्तू उभारल्या, जसे की बिहार म्युझियम, सम्राट कन्व्हेंशन सेंटर, सरदार पटेल भवन (बिहार पोलिसांचे मुख्यालय) आणि बापू टॉवर.

दरम्यान, नितीश कुमार हे विटांचे बांधकाम करण्यात अडकल्याची टीका केली जाते. नितीश कुमार शाळा बांधण्यात यशस्वी झाले, पण उत्कृष्ट शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यांनी चांगली रूग्णालये बांधली, पण तिथे डॉक्टरांची संख्या समाधानकारक ठेवण्यात ते अपयशी झाले. त्यांनी आर्यभट्ट ज्ञान विद्यापीठ आणि चाणक्य विधी विद्यापीठाची स्थापना केली. तसेच सिमूलतला (जमुई) शाळा उभारल्या. पटना वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात एकेकाळी चंद्रशेखर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रक्रिया केली होती. पण आज नितीश कुमार स्वत: व इतर बिहारी राजकीय नेते उपचारांसाठी दिल्लीत पळतात. बिहार सरकारच्या रूग्णालयांमध्ये उपचार घेण्यापेक्षा दिल्लीत जाणे त्यांना सोईस्कर वाटते.

अधिक वाचा  ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ ३३ % महिला आरक्षण आज संसदेचे 2 दिवस विशेष अधिवेशन सुरु; अशी आहे संरचना

कायदा आणि सुव्यवस्था

काँग्रेसच्या कार्यकाळात बिहारला जातीय आणि धार्मिक तणावाला सातत्याने सामोरे जावे लागत होते. लालू प्रसाद यादव व राबडी देवी यांच्या कार्यकाळात बिहारने हिंसक जातीय दंगली अनुभवल्या. नितीश कुमार यांच्या कार्यकाळात जातीय दंगलींचे प्रमाण नगण्य होते. हेच नितीश कुमार यांना आधीच्या सरकारच्या तुलनेत मिळालेले यश होते.

नितीश कुमार यांनी स्पेशल ऑक्झिलरी पोलीस (Special Auxiliary Police – SAP) दलाची स्थापना केली. तसेच गुन्हेगारी प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचा प्रमाण वाढवले. देशात बिहारमध्ये महिला पोलिसांची संख्या सध्या सर्वाधिक आहे. बिहारचे तत्कालीन पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी एकदा सामान्य वेषात दोन महिला पोलिसांच्या हातात बंदुक पाहून त्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला बंदुक चालवता येते का असे पांडे यांनी विचारले. त्यावर दोन्ही महिला पोलिसांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर बंदुकीचे टोक रोखले. पांडे यांनी तातडीने स्वत:ची ओळख सांगितली. त्यानंतर त्या दोन्ही महिलांना त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पारितोषिक देण्यात आले होते.

सामाजिक न्याय

कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये ‘कोटा के भीतर कोटा’ (इबीसी, ओबीसी, महिला आणि उच्चवर्णीय जातीतील गरीबांसाठी २६ टक्के आरक्षण) धोरण आणले. लालू प्रसाद यादव यांनी गरीबांना वाचा फोडली. नितीश कुमार यांनी असाच सामाजिक न्यायाचा प्रयोग केला. नितीश कुमार यांनी सामाजिक कल्याण आणि शिक्षणाशी संबंधित योजना राबवल्या. नववीतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल, गणवेश, स्कॉलरशिप, ट्युशन फी माफ अशा सुविधा नितीश कुमार यांनी दिल्या. त्यांच्या सामाजिक योजनांचा परीघ वाढत गेला. इबीसी आणि अनुसूचित जातींमध्ये नितीश कुमार यांचा प्रभाव पडला व तो कायम राहिला. ओबीसींना स्वत:कडे वळवण्यासाठी नितीश यांनी सोशल इंजिनियरिंगचे प्रयोग केले.

अधिक वाचा  वोहर औद्योगिक कंपनीत निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची दबंगगिरी; एकल कुटुंब त्रस्त मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार

महिला सशक्तीकरण

मला बिहारचे चित्र कसे असायला हवे विचारले तर मी सांगेल एक मुलगी सायकलवर शाळेत जात आहे, असे बिहारचे चित्र मला आवडेल, असे नितीश कुमार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला २०१५ मध्ये सांगितले होते. नितीश कुमार यांनी महिलांना पंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षण २००६ मध्ये दिले. पोलीस व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के जागा राखीव केल्या. ‘जेंडर बजेट’ आणणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. नितीश कुमार यांनी ‘जीविका’ उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत आज बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात महिला ‘दिदी की रसोई’ चालवतात.

जुळवाजुळवीच्या राजकारणात तज्ज्ञ

नितीश कुमार हे कोणाबरोबर युती करतील, कोणाच्या बाजूला जाऊन बसतील, हे कोणीच सांगू शकत नाही. अशी नितीश कुमार यांची राजकीय प्रतिमा तयार झाली आहे. १९९६ मध्ये नितीश कुमार यांनी लालू यादवांना पाडण्यासाठी भाजपाबरोबर युती केली. कधी एखाद्या पक्षाबरोबर जाऊन तर कधी एखाद्या पक्षाची साथ सोडून नितीश कुमार सत्तेत काय राहिले. बिहारमध्ये फक्त २.८ टक्के लोकसंख्या असलेल्या समाजातून नितीश कुमार येतात. इतके कमी पाठबळ असताना बिहारसारख्या राज्याचे त्यांनी २० वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले. भाजपा आणि लालू प्रसाद यादव यांच्यात नितीश कुमार यांनी कायम समतोल साधला. नितीश कुमार यांनी भाजपा व लालू यांना स्वत:साठी कायम पायांच्या बोटांवर उभे ठेवले. १९७७ च्या विधानसभा निवडणुकीत हरनौत मतदारसंघातून पराभूत झालेले नितीश कुमार पाटण्यातील एका कॉफी हाऊसमध्ये पत्रकारांशी गप्पा मारत बसले होते. गप्पा मारताना गंभीर विषयांवर चर्चा सुरू झाली. नितीश कुमार यांनी आवेगात टेबलवर थाप देत एक दिवस मी मुख्यमंत्री होणार असे सांगून टाकले. त्याचे नितीश कुमारांनी आज त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द संपवली आहे.