काँग्रेसचा महाराष्ट्रात ‘संघटन सृजन’ कार्यक्रम; ४५ जिल्हाध्यक्ष बदलणार; महिना अखेरीस निवड प्रक्रियाही पूर्ण करणार!

0

महाराष्ट्रातील काँग्रेसचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कंबर कसली असून ‘बाहुबली’ नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन तळागाळात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने राज्यातील काँग्रेसची कार्यकारणी तयार केली जाणार आहे. पारंपारिक पक्षाची घराणी ही ताकत असली तरीसुद्धा पक्ष वाढीसाठी येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन राज्यामध्ये संघटन सृजन कार्यक्रम सुरू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारणी मध्ये एक महिन्याभरातच बदल करण्यात येणार आहे.

या नव्या निर्णयामुळे घराणेशाहीच्या विळख्यात सापडलेला पक्ष पुरोगामी विचाराच्या नव तरुणांच्या हाती जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील किमान ४५ जिल्ह्याध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह ८ हजार नवे पदाधिकारी येत्या २ महिन्यात नेमण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.

अधिक वाचा  महाराष्ट्रात आमदारकीच्या या 17 जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! या एका नियमाने बदलली समीकरण

राज्यात काँग्रेसचे संघटनात्मक दृष्ट्या ६० जिल्हे आतापर्यंत होते. त्यातील ४५ जिल्हाध्यक्ष बदलले जातील. या शिवाय अलिकडेच सपकाळ यांनी संघटनात्मक दृष्ट्या १२ नवीन जिल्हे तयार केले आहेत, त्यांच्याही अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस सध्या महाराष्ट्रात ‘संघटन सृजन’ कार्यक्रम राबवत आहे. त्यासाठी दिल्लीहून प्रत्येक जिल्ह्यात एक निरिक्षक पाठविण्यात आले असून नवीन अध्यक्षांच्या नावांचे पॅनेल केंद्रीय नेतृत्वाकडे देतील. नवीन जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती करणार आहे.

पाच वर्षे पूर्ण झालेल्या अध्यक्षांना हटवणार

पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष असलेल्या सर्वांनाच हटवून त्याजागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत. अ.भा.काँग्रेसने पाच वर्षांचा निकष निश्चित केला आहे. महाराष्ट्रात पाच वर्षांहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष असलेले बरेचसे नेते आहेत, त्यांना बदलले जाईल.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घटनादुरुस्तीवरून विरोधी पक्षांना इशारा विरोधाची किंमत मोजावी लागेल! 

सपकाळ यांनी सांगितले की नवीन नियुक्ती करण्यास कोणाचाही विरोध नाही. बरीच वर्षे अध्यक्ष राहिलेले नेतेही त्यांच्या जागी नवीन चेहरा द्या असा आग्रह धरत आहेत. आहेत त्या जिल्हाध्यक्षांना हटवायचे आहे असा विषय नाही, नवीन चेहर्यांना संधी देण्याचे धोरण अ.भा.काँग्रेसने स्वीकारले आहे.