चवदार तळे शताब्दी महोत्सवास शासनाने महाडला एक हजार कोटी अनुदान द्यावे – आनंदराज आंबेडकर 

0

महाड दि. २० (रामदास धो. गमरे): ज्ञानसूर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रतापसूर्य बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या दोघांची क्रांतीभूमी महाड आहे आणि याच महाड क्रांतीभूमीत या दोन्ही महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाचा इतिहास रचला आहे या महाड क्रांतीभूमीत येणारे २०२७ हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून येत आहे याकरता शासनाने ५५ कोटी अनुदान जाहीर केले असून मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते आज सकाळी भूमिपूजन झाले आहे परंतु माझी शासनास विनंती आहे की कुंभमेळाव्यास आपण कोट्यवधी रुपयांचे अनुदान देता कुंभमेळा पुन्हा येईल पण शताब्दी वर्ष पुन्हा येणार नाही म्हणून आपण जे ५५ कोटी रुपये जाहीर केले आहेत त्या तुटपुंज्या पैशात महाडचा कायापालट होणार नाही म्हणून सदर शताब्दी महोत्सवास शासनाने एक हजार कोटी अनुदान द्यावे अशी भूमिका सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केली सदर अनुदानातून महाड व रायगड जिल्ह्यात रस्ते, पाणी, विज, शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्राची रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निर्मिती, जीवनावश्यक सुविधा, लघुउद्योग, ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकिल्यांचे सुशोभीकरण करून महाड व रायगड जिल्ह्याचा कायापालट करता येईल, सन २० मार्च १९२७ च्या संग्रामात तत्कालीन दलीत सेवा संघ म्हणजे विद्यमान बौद्धजन पंचायत समितीच मोठ योगदान आहे हे विसरून चालणार नाही म्हणून शासन जर भिमसृष्टी प्राधिकरण योजना चालवणार असेल तर बौद्धजन पंचायत समितीला विश्वासात घेतल्याखेरीज ती योजना पूर्णत्वास जाणार नाही असे नमूद केले, महाराष्ट्र शासनाने समाज घटकांच्या विकासासाठी आजवर पंचवीसच्या आसपास महामंडळे निर्माण केली असून त्यात त्या त्या समाजाच्या प्रमुखांची नियुक्ती केली आहे त्यामुळे बार्टी सारख्या महामंडळावर बौद्ध समाजाच्या अध्यक्षाची निवड करण्यात यावी जेणेकरून बौद्ध तरुण तरुणींना त्याचा लाभ होईल, तसेच सरकारने एसटी, एससी स्कॉर्लरशिप संदर्भात नवीन जो कायदा आणला आहे तो बौद्ध तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे म्हणून तो कायदा सरकारने तत्काळ रद्द करावा आणि येणाऱ्या शताब्दी महोत्सवानिमित महाडचा कायापालट करण्यासाठी शासनाने एक हजार कोटी अनुदान द्यावे, तसेच शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर कार्यक्रम चालवण्याचा संकल्प बौद्धजन पंचायत समितीने सोडला असून यात देश विदेशातील मान्यवर, भंतेगन, भिक्षूगन, प्रतिष्ठित व्यक्ती, विविध राजकीय पक्षांची मान्यवर नेते मंडळी, पुढारी, विचारवंत, साहित्यिक मोठ्या प्रमाणात येणार आहेत म्हणून तमाम भीम अनुयायांनी या शताब्दी महोत्सवाला आतापासून कामाला लागा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करा असे आवाहन केले.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने ९९ वा महाड क्रांती संग्रामाचा वर्धापनदिन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी महामानवांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली तद्नंतर मंगेश पवार, मनोहर मोरे यांनी धार्मिक विधी पठण केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले, सदर कार्यक्रमास मनीषाताई आंबेडकर, ऍड. अमन आंबेडकर, महाड तालुक्याचे अध्यक्ष साळवी उपसभापती विनोद मोरे, बाबासाहेबांची वेशभूषा करून माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, रिपब्लिकन सेना अध्यक्ष सुर्यवंशी, रायगडचे गटप्रमुख भूपेंद्र सवाटकर, सचिव रवींद्र शिंदे, एच. आर.पवार, कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपले मौलिक असे विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

उपसभापती विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात “भिमसृष्टी प्राधिकरण योजना राबवायची असेल तर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती माननीय आनंदराज आंबेडकर यांना मानाचं स्थान देण्यात यावे कारण महाड क्रांती लढ्यात बौद्धजन पंचायत समितीचे मोठे योगदान आहे” असे नमूद केले.

सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार जी, खजिनदार नागसेन गमरे, अति. सरचिटणीस विठ्ठल जाधव, चिटणीस यशवंत कदम, लवेश तांबे, भगवान तांबे, रवींद्र शिंदे, तुकाराम घाडगे, अनिरुद्ध जाधव, अनंत शिर्के, श्रीधर जाधव, विश्वस्त अतुल साळवी, सुभाष जाधव, ध्रुपद मोरे, राजाभाऊ गमरे, गजानन तांबे, विजय तांबे, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर मोरे, मध्यवर्ती महिला मंडळ अध्यक्षा सुशीलाताई जाधव, प्रज्ञा जाधव, सायली साळवी, सोनाली गायकवाड, रसिका पवार, प्रदीप तांबे, प्रवीण तांबे, फोटोग्राफर प्रशांत, कोकण कला मंच कलाकार, आणि आजी माजी विश्वस्त, रायगड जिल्हा गटप्रतिनिधी भूपेंद्र सवादकर, रत्नागिरी जिल्हा गटप्रतिनिधी उत्तम जाधव, गोवा राज्य प्रतिनिधी विकास गायकवाड, तसेच पेण, उरण, पाली, अलिबाग, रोहा, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली, मंडणगड, संगमेश्वर, वैभववाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र आणि मुंबई विभागातील पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळ, संस्कार समिती, शिक्षण समिती आदी समित्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ आणि कार्यकर्ते समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद