इंग्लंडला लोळवून टीम इंडिया ठरली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वविजेतेपदाचा षटकार आयुष म्हात्रे नवा विक्रमवीर

0

वैभव सूर्यवंशीची तोडफोड बॅटिंग, ८० चेंडू, १७५ धावा, त्यात १५ षटकार, १५ चौकार, आयुष म्हात्रेची कर्णधारपदाला साजेशी फिफ्टी आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेला खोचक मारा या जोरावर भारताच्या अंडर १९ संघानं विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. आयसीसी पुरुष १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय मिळवला. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी (१७५) च्या धमाकेदार खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर गारद झाला. यासह भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची शानदार खेळी केली, तर भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेनेही शानदार अर्धशतक झळकावले.

अधिक वाचा  शरद पवारांचा ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅनही रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

दरम्यान भारतीय संघाने दिलेल्या डोंगराएवढ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली राहिली नाही. जोसेफ मूर्स (१७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. खिलान पटेलने मेसला बाद करून ही भागीदारी मोडली. मेसने २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावा केल्या. भारतीय संघाला तिसरी विकेट थॉमस रेवच्या रुपात मिळाली. त्याने ३१ धावा केल्या. यानंतर, बेन डॉकिन्स ५६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावांची खेळी खेळून बाद झाला.

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण