राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.’अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. अजित पवार सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. आज हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (शरद पवार गट) पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.






शपथविधीबाबत शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार गेल्यानं आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. लोकांना न्याय द्यायचं काम अजित पवार करत होते. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. त्यामुळे कर्तृत्वान नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे’. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. नरेश अरोरा यांच्यावर त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ‘नरेश अरोरा कोण? हेही मला माहिती नाही. तसेच ‘सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, याची मला काहीच माहिती नाही. प्रफुल पटेल, सुनील तटकरे या लोकांनी निर्णय घेतला असावा. हा त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत निर्णय आहे’, असं देखील शरद पवार यावेळी सांगितलं आहे.
विलीनीकरणाचा निर्णय आम्हाला…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, यावर चार महिन्यांपासून चर्चा सुरु होती. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विलीनीकरणाची चर्चा झाली होती. मात्र, आता विलीनीकरणाच्या चर्चेत खंड पडलेला दिसतोय. आता जो गेला त्याला आपण परत आणू शकत नाही. सध्याच्या स्थितीचा सामना करणे हे आव्हानात्मक आहे. कुणी ना कुणी अजित पवारांची जबाबदारी घेतली पाहिजे. सुनेत्रा आणि रोहितला मंत्रिपदावर घेण्यासंबंधी मला काहीच माहिती नाही. सुनेत्रा पवारांच्या निवडीची मागणी त्यांच्या पक्षातूनच होत आहे. अजित पवारांच्या पक्षाची पद्धत असेल म्हणून तसे निर्णय होतायत. 12 तारखेला विलीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता’, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी यावेळी केलंय.











