त्याग, समर्पण आणि सातत्याची; भाजपा तुमची आमची सर्वांची! या समर्पित भावनेने आजपर्यंत बाणेर बालेवाडी परिसरामध्ये प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीने आरोप प्रत्यारोपण पेक्षा जनसेवा आणि जनसंवाद हा महत्त्वाचा अशी भूमिका घेतली आहे. रात्रंदिवस भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या या बालिश वृत्तीला किंमत न देता पोक्त आणि समर्पित समाज कार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जनसंवाद गाठीभेटी यांना भेट महत्व दिल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असून कितीही आरोप केले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याला किंमत दिली जात नसल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच प्रभागातील सातही गावांमध्ये लोकप्रिय भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी नव्या चेहऱ्यांच्या या पॅनलला डोक्यावर घेऊन उत्साहाने स्वागत केल्याने प्रभागाचे चित्र बदलले आहे.






भारतीय जनता पक्ष हा कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीनुसार समर्पण त्याग आणि सातत्य या तिहेरी तत्त्वांना जीवापेक्षा जास्त महत्त्व देत आला आहे. बाणेर बालेवाडी पाषाण या भागात 25 ते 30 वर्षापासून समर्पण आणि त्यागी भूमिकेत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षाची विचारधारा पक्की झालेली असताना सुद्धा मागील निवडणुकीच्या वेळी ‘नवा चेहरा’ या फक्त एकमेव कल्पनेमुळे ज्यांना विजयी केले त्यांना आता आपणच ‘भाऊबली’ अशी स्वप्न पडू लागली आहेत. सध्या त्यांच्याकडून आवाक्याबाहेरील ‘दंड बैठका’ सुरू असून या बालिशपणाला बळी न पडता भारतीय जनता पक्षाने जनसंवाद आणि जनसंपर्क दौरा याला महत्व देत आपली विचारधारा जपण्याचे काम केल्याने नव्या फळीच्या नव्या दमाच्या उमेदवारांसाठी ‘घरोघरी दारोदारी यत्र तत्र सर्वत्र फक्त तुमची आमची भाजपा सर्वांची असा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. भाजपा उमेदवार लहू बालवडकर यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो सार्थकी लावण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाली असून ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नव्या दमाच्या तरुण फळीने यंदा ‘करेक्ट’ कार्यक्रम असा दृढ संकल्प केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहराचा स्वाभिमान आणि अभिमान असलेल्या स्मार्ट सिटी लगत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस आणि माळुंगे या गावाला ही बाणेर बालेवाडी पासून प्रमाणे ‘स्मार्ट’ करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी प्रचाराच्या दरम्यानच नागरिकांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधतानाच समस्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. भेटीदरम्यान नागरिकांच्या अनुभवांची, दैनंदिन समस्या, जीवनगप्पा आणि विकासाबाबतच्या अपेक्षांचा मनमोकळा संवादामुळे परिसरात भारतीय जनता पक्षाबाबत अधिकच सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.










