WTC Final भारतात नाही, जय शहांच्या निर्णयाने BCCI आणि भारतीय चाहत्यांना धक्का

0

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याचे आयोजन भारतात होईल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींसह BCCI ला आशा होती. ICC चे चेअरमन म्हणून जय शहा यांच्या निवडीनंतर या शक्यतेला बळ मिळाले होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ही आशा धुळीस मिळाली आहे. एक अहवाल सांगतो की, WTC चे पुढील तीनही फायनल्स इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.

ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, ICC ने WTC च्या पुढील तीन आवृत्त्यांचे फायनल्स इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 2021 आणि 2023 मधील फायनल्स अनुक्रमे साउथॅम्प्टन व लंडन (द ओव्हल) येथे खेळवण्यात आले होते. चालू सत्रातील फायनलही इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होत आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात आमदारकीच्या या 17 जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! या एका नियमाने बदलली समीकरण

टेलिग्राफच्या माहितीनुसार, हा ट्रेंड 2031 पर्यंत म्हणजे WTC च्या सहाव्या फायनलपर्यंत कायम राहणार आहे. यासंदर्भात ICC ने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला तोंडी कळवले आहे. या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब ICC ची वार्षिक परिषद जुलैमध्ये सिंगापूर येथे होईल, तिथे होईल.

BCCIची मागणी फेटाळली
भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढील तीन फायनल्सपैकी किमान एक फायनल भारतात आयोजित करण्याची मागणी ICC कडे केली होती. मात्र, ती मागणी मान्य केली गेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, भारतात WTC फायनल पाहण्यासाठी BCCI आणि क्रिकेटप्रेमींना किमान 2033 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

अधिक वाचा  शिवडी विभागात भीम जयंती निम्मित भव्य मिरवणुक संपन्न

इंग्लंडची निवड का?
इंग्लंडमध्ये होणाऱ्या फायनल्ससाठी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद ही एक प्रमुख कारणीभूत बाब आहे. मागील दोन फायनल्स ‘सोल्ड आउट’ झाले होते आणि भारतीय संघ सहभागी असल्याने इंग्लंडमधील भारतीय प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. विशेष म्हणजे, चालू फायनलमध्ये भारत सहभागी नसतानाही (ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका) प्रेक्षकवर्ग प्रचंड दिसून आला, हे इंग्लंडच्या यशस्वी आयोजनाचे लक्षण मानले जात आहे.