गुहागर दि. १९ (रामदास धो. गमरे) जिल्हा परिषद रत्नागिरी अनुसूचित जाती व नवबौद्ध गटाला वस्ती विकास योजने अंतर्गत ग्रामपंचायत मुंढर कातकीरी बौद्धवाडी एस.टी. स्टॉप ते जेतवन बुद्धविहार रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते ३० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले, सदर प्रसंगी माजी सभापती सुनिल पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रवीण ओक, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सरपंचा अमिषा गमरे, माजी सरपंच प्रमोद शिर्के, उपसरपंच अजित गमरे आदी मान्यवर उपस्थित होते.






सदर रस्त्याचे काम सरपंचा अमिषा अजित गमरे व बांधकाम विभाग अभियंता ढगे साहेब यांनी जातीने कामावर बारीक लक्ष ठेवून सर्वांचा पाठपुरावा करून अवघ्या पंधरा दिवसांत डांबरीकरण करून रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले त्यामुळे गावात त्यांचे कौतुक केले जात आहे.
सरपंचा अमिषा गमरे यांनी सरपंच पदाचा पदभार सांभाळल्यापासून केवळ तीन महिन्यांच्या काळातच त्यांनी कचरा प्रकल्प शेड, जिल्हा परिषद मराठी शाळा क्र. १ येथे बोरिंग, गावातील सार्वजनिक ठिकाणी सौरदीपची व्यवस्था आदी कामे त्यांनी ग्रामपंचायत मुंढर कातकीरी मार्फत अत्यंत तत्परतेने व जलद गतीने त्यांनी पूर्ण करून घेतली आहेत, सोबतच जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी साठवन टाकीचे काम ही साध्य जलद गतीने सुरू आहे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले असून पंचायत समितीमध्ये त्याचा पाठपुरावा करून ती सर्व कामे लवकरच पूर्णत्वास नेतील अशी जनमानसात चर्चा आहे.
अमिषा गमरे सरपंच झाल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयीन वेळत कोणताही कामचुकारपणा न करता सातत्याने ग्रामस्थांकरता उघडे आहे त्यामुळे संपूर्ण गावात त्यांचे कौतुक केले जात आहे, ग्रामविकास या एकाच ध्येयाने पछाडलेल्या अमिषा गमरे यांचे काम पाहता आपण सदर कर्तृत्ववान महिलेस खूपच उशिरा संधी दिली जर आधीच संधी दिली असती तर आजवर त्या संधीच सोन करीत त्यांनी विकास कामांनी गावचा कायापालटच केला असता अशी जोरदार चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये होत आहे.











