मोदी सरकारची 6G साठी मोठी योजना, इंटरनेट 5G पेक्षा असेल 100 पट वेगवान

0

5जी नंतर, भारत आता वेगाने 6जीकडे वाटचाल करत आहे, असे दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी अलिकडेच भारत 6जी 2025 परिषदेदरम्यान माहिती दिली की 111 हून अधिक संशोधन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे आणि या प्रकल्पांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, 6G पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत भारत आता पहिल्या 6 देशांमध्ये सामील झाला आहे.

चंद्रशेखर पेम्मासानी म्हणाले की, 6G तंत्रज्ञान टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँडवर काम करेल आणि त्याचा वेग एका सेकंदात 1 टेराबिटपर्यंत पोहोचू शकतो, म्हणजेच 6G चा वेग 5G पेक्षा 100 पट जास्त असेल.

अधिक वाचा  कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?

जर 6G चा वेग 5G पेक्षा इतका जास्त असेल, तर तुमची अनेक कामे क्षणार्धात पूर्ण होतील जसे की मोठ्या फाइल्स काही सेकंदात डाउनलोड होतील. याशिवाय, इंटरनेट सर्फिंग करताना, व्हिडिओ पाहताना, व्हिडिओ कॉल करताना आणि OTT वर चित्रपट पाहताना तुम्हाला स्लो स्पीडची समस्या येणार नाही.

दूरसंचार राज्यमंत्र्यांनी सांगितले की, भारतात प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि अभियंते आहेत, ज्यामुळे भारत 6G तंत्रज्ञानात जागतिक नेता बनू शकतो. आमच्याकडे 6G च्या संशोधन आणि नवोपक्रमासाठी पुरेसा वेळ आहे. 6जी तंत्रज्ञानामुळे केवळ विद्यमान उद्योगच नव्हे, तर अनेक नवीन उद्योगही उदयास येतील.

अधिक वाचा  पुणे महापालिकेत महायुतीत ठिणगी; ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा देत ‘एल्गार’च पुकारला

एवढेच नाही तर, 2035 पर्यंत 6जी भारताच्या अर्थव्यवस्थेत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची भर घालू शकते. 6जी सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करता येईल? सध्या तरी याबाबत कोणतीही अचूक माहिती समोर आलेली नाही. सध्या भारतात, एकीकडे रिलायन्स जिओ, एअरटेल हे 5जी सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत, तर दुसरीकडे व्होडाफोन आयडिया देखील 5जी नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात गुंतलेली आहे.