पुरंदरमध्ये मोठा राडा; विमानतळावरुन शेतकरी -पोलीस आमनेसामने, लाठीचार्जमध्ये महिलेचा मृत्यू! गावकऱ्यांनी ड्रोन सर्वे बंद पाडला

0

पुणे : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय. मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केला आहे . शेतकऱ्यांच्या मनात रोष वाढतच चालला आहे. याच रोषातून आज आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तसेच मोठा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला आहे .

अधिक वाचा  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच तापवणार!अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्…; ‘हे’ मुद्दे केंद्रस्थानी

पुरंदरच्या विमानतळासाठी सुरू असणाऱ्या ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करण्यास भाग पाडलं होतं. यानंतर आज प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. ड्रोन्स सर्वे करण्यात येणार होता. मात्र आजही सात गावातील नागरिकांनी या सर्वेला विरोध केला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपट झाली. पोलिसांनी अश्रू धुराचा मारा करत लाठी चार्ज केला. या लाठीचार्जमध्ये कुंभारवळण गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अंजनाबाई कामटे ( वर्ष 60) असे महिलेचे नाव आहे.

परिसरातील लोक आता संतप्त

या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. तर या लाठीचार्ज दरम्यान एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. यानंतर या परिसरातील लोक आता संतप्त झाले आहेत. दरम्यान प्रशासन आणि पोलीस हे आता या भागातून माघारी गेले असून असून शेतकरी मात्र आक्रमक आहेत. मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण

कोणती सात गावे निश्चित केली?

या प्रकल्पासाठी वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव ही सात गावे निश्चित करण्यात आली आहेत. एकूण सुमारे २७०० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध केला आहे.