“सुरेश धस यांना ही दोन टार्गेट पुर्ण करण्यास पाठवलंय” मिडिया स्पेसची मला गरज नाही ….मी आहे तो परफेक्टच

0

मराठा समाजात फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, जरांगेंना कापायला पाठवलंय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणीतून निघालेल्या लाँग मार्चमध्ये सहभागी आंदोलकांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनीही उत्तर दिलं होतं. त्याला पुन्हा उत्तर देत आव्हाडांनी धसांवर हल्लाबोल केला आहे.

सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना म्हटलं होतं, की आव्हाड सोमनाथच्या नावानी आले आणि अक्षय शिंदेंचं गुणगाण गायलं. तसंच आव्हाडांना मोर्चाच पाहिजे असेल तर तिकडे ठाण्यात काढावा असं सुरेश धस म्हणाले होते. त्याला आव्हाडांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेश धस यांच्या ‘पोलिसांना माफ करण्याबद्दलच्या वक्तव्याला’ सोमनाथच्या आईने माऊलीने उत्तर दिलंय. त्या माऊलीला सलाम.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

“अक्षय शिंदेचं मी गुणगाण गायलं नाही, तो गुन्हेगार असेल तर शिक्षा होईल. आम्ही म्हणत नाही खून झाला, न्यायाधीशांना सांगितलं की एन्काऊंटर नाही. शाळेतलं सीसीटीव्ही कुठे गेलं? का नाही आपटेची चौकशी झाली? का ती केस रजिस्टर नाही झाली?” असा सवाल आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले, मिडिया स्पेसची मला गरज नाही. अचानक माझे इन्स्टापेज सुरू होता नाही, ढोल वाजवताना, मान हालवताना….मी आहे तो परफेक्ट आहे. आपलं काम आपल्या पद्धतीनं करा. तुमचं काम एवढंच की जरांगेंना कापायचं, मराठा समाजात फूट पाडायची. हे लोकांना कळत नाही का? असं आव्हाड म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन