CM आले, १० दिवस झाले, तरीही निकाल न लागे; शिंदेंच्या नाराजीमागचं कारण काय? अखेर उलगडा झाला

0

मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या दरेगावच्या फेऱ्या वाढल्या आहेत. निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यानंतर खातेवाटपावरुन बरीत खेचाखेच झाली. मग पालकमंत्रिपदावरुन तणातणी पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकांनी गैरहजर राहत असल्यानं नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या नाराजीमागील कारणाचा अखेर उलगडा झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी वॉर रुमची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिले. त्यानंतर नगर विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठका नियोजित होत्या. त्या बैठकांनादेखील शिंदे गैरहजर राहिले. मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. सरकारच्या महत्त्वाच्या बैठकांना शिंदे सातत्यानं अनुपस्थित राहत आहेत. त्यामागचं कारण रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा न सुटलेला तिढा आहे.

अधिक वाचा  भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ या महिला क्रिकेटरला अटक! ….या रॅकेटमुळे मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदांवरुन शिवसेनेत नाराजी आहे. महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहून शिंदे ती नाराजी दाखवून देत आहेत. रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथून परतल्यानंतर ते स्थगिती देण्यात आलेल्या पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. पण दावोसहून परतून १० दिवस उलटले तरीही फडणवीसांनी २ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा पेच सोडवलेला नाही. त्यामुळे शिंदे नाराज आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेकडून जोरदार विरोध झाल्यानंतर दोन्ही नियुक्त्यांना स्थगिती मिळाली. रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावले आणि नाशिकचं पालकमंत्रिपद दादा भुसेंना मिळावं अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. पालकमंत्री होण्याची इच्छा असण्यात काही गैर नाही, असं म्हणत शिंदेंनी याबद्दलची त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांची पहिल्यांदाच ही खंत? दोन दिवसानंतर रुग्णालयातून पहिली पोस्ट, …विविध पर्यायांचा तपास परंतु पर्यायच उपलब्ध नाही!

मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर रायगड, नाशिकबद्दलचा निर्णय घेतील, असं सांगण्यात आलं होतं. पण फडणवीस मायदेशी परतून १० दिवस लोटले तरीही त्यांनी याबद्दलचा निर्णय न घेतल्यानं सेनेत अस्वस्थता आहे. पक्षातील असलेली नाराजी शिंदे वारंवार दाखवून देत आहेत. सामाजिक क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक बोलावली होती. त्या बैठकीला गैरहजर राहत शिंदेंनी संदेश दिला आहे.