“इतिहासाकडे जरा मागे वळून पाहिलं तर देश संविधानाचे २५ वर्ष पूर्ण करत होत तेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. संविधानाची व्यवस्था नष्ट करण्यात आली. देशाला जेल बनवण्यात आलं. लोकांचे अधिकार हिसकावून घेतले. पत्रकारांचे अधिकार हिरावून घेतले. काँग्रेसच्या माथ्यावर लागलेलं हे पाप कधी पुसणार नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या पापाची चर्चा होईल. संविधान निर्मात्यांची मेहनत मातीत मिळवण्याचा प्रयत्न झाला. हे कधीच विसरलं जाणार नाही” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.






लोकसभेमध्ये संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण करत काँग्रेस आणि गांधी घराण्यावर जोरदार प्रहार केला.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे-
– भारताची लोकशाही आणि त्याचा इतिहास हा ऐतिहासिक राहिला आहे. त्यामुळे जगभरात भारताच्या लोकशाहीचा आदर्श आहे. भारत हा मदत ऑफ डेमोक्रेटिक म्हणून ओळखला जातो.
राजश्री – आमच्या देशामध्ये पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे हे आमच्या मनात आपल्या गौरवशाली भारताचा इतिहास लिहिला जात आहे. जेव्हा आमच्या सभा होत होत्या.
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “असं नाही की भारताला माहिती नाही की लोकशाही काय असते. एक वेळ अशी होती की, भारतात अनेक गणतंत्र होते.
– संविधान निर्माण करण्यामध्ये महिलांचं मोठं योगदान होतं..वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला होत्या. त्यांनी संविधान निर्मितीमध्ये अनेक सल्ले दिले होते. महिलांना अधिकार देण्यासाठी दशकं लोटली. संविधानामुळे महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. जेव्हा जी २० समिट झालं होतं.
-आज आपण पाहतो की, प्रत्येक योजनेमध्ये महिला या केंद्रस्थानी असतात. लोकसभेतही महिला खासदारांची संख्या वाढत आहे. शिक्षण, खेळ, कला असो प्रत्येक क्षेत्रात महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिलांचं मोठं योगदान आहे, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे.
-भारत हे तिसरी आर्थिक शक्ती बनण्यासाठी पाऊल टाकले आहे. १४० कोटी जनतेनं स्वप्न पूर्ण होत आहे. भारत आज अतिश वेगानं प्रगती करत आहे.
-सभापतीजी, आज मला दुखाने सांगावं लागत आहे, संविधानाची निर्मिती करणाऱ्यांच्या मनामध्ये सर्व जण एकत्र राहावे अशी भावना होती, पण स्वातंत्र्यानंतर विकृती मानसिकतेमुळे सगळ्यात मोठा प्रहार हा भारताच्या मुलभावावर झाला आहे. विविधतेला आपण उत्सव करत होतो. पण ज्यांनी गुलामीमध्ये आयुष्य घालवलं ते विविधतेमध्ये विरोधाभास शोधत होते. विषारी बिया पेरत होते ज्यामुळे भारताची एकता धोक्यात आणली आहे.
-भारत हे तिसरी आर्थिक शक्ती बनण्यासाठी पाऊल टाकले आहे. १४० कोटी जनतेनं स्वप्न पूर्ण होत आहे. भारत आज अतिश वेगानं प्रगती करत आहे.
– मागील १० वर्षांमध्ये आमच्या कार्याचा आढावा घेतला तर तुम्हाला आमची भावना पाहण्यास मिळेल. काश्मीरमध्ये ३७० आम्ही हटवलं. देशामध्ये आर्थिक सुधारासाठी जीएसटीने मोठं काम केलं आहे. आधीच्या सरकारनेही काम केलं. वन नेशन वन टॅक्स हे आम्ही आणलं. रेशन कार्ड हे भारतीयांसाठी महत्त्वाचं आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्याला अडचण येऊ नये म्हणून वन नेशन वन रेशन आम्ही आणलं. गरीब लोकांना मोफत उपचार मिळावा यासाठी आम्ही सुविधा पुरवली. देशाची एकता कायम राखण्यासाठी वन नेशन वन हेल्थ कार्ड, आयुष्यमान भारत योजना आणली. बिहारमधला एखादा व्यक्ती पुण्यात आजारी पडला तर तो आयुष्यमान भारत कार्ड दाखवून उपचार घेऊ शकतो. देशात एकीकडे अंधार होता, मागील सरकारच्या काळात परदेशामध्ये भारताचा उल्लेख हा चुकीचा होत होता. पण आम्ही वन नेशन वन ग्रीड आणलं त्यामुळे आज देशातील कानाकोपऱ्यात वीज पुरवठा झाला आहे.
नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी ते राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केला – मोदी
‘१९४७ ते १९५२ पर्यत या देशामध्ये एक निवडक सरकार होतं. तेव्हा निवडणूक झाली नव्हती. अंतरिम ही व्यवस्था होती. १९५२ च्या आधी राज्यसभेचंही गठण झालं नाही. राज्यातही सरकार नव्हतं. १९५१ मध्ये निवडलेलं सरकार नव्हतं. पण त्यांनी संविधानात बदल केले आणि लोकांच्या अभिव्यक्तीवर हल्ला केला. लोकांचा त्यांनी अपमान केला. संविधान सभेत अशी कोणत गोष्ट आली नाही. पण त्यांचं तिथं कुणी ऐकलं नाही. पण जशी संधी मिळाली त्यांनी अभिव्यक्तीवर हातोडा माणला. त्यांनी आपल्या मनाने केलं. त्यांनी मागील दरवाजाने येईन हे पाप केलं. जेव्हा कोणतंही सरकार नव्हतं. त्याच दरम्यान त्यावेळीचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, जर संविधान आमच्या रस्तेत येणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल झाले पाहिजे. हे नेहरू यांनी सांगितलं होतं, असं म्हणत मोदींनी नेहरूंचं पत्रच वाचून दाखवलं.
“एवढंच नाहीतर १९५१ मध्ये राजेंद्र सिंह यांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. अध्यक्षांनी हे चुकीचं असल्याचं नेहरू यांना सांगितलं होतं. त्यावेळी आचार्य पिपलानी, जयप्रकाश नारायण सारख्या ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी नेहरूंना थांबण्याचा सल्ला दिला होता. पण नेहरूंना आपल्या मनाचं संविधान पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी मोठ्या नेत्यांचं ऐकलं नाही’ अशी टीकाही मोदींनी केली.
“संविधान संशोधन करण्याचा खून करण्याचा त्यांच्या तोंडाला रक्त लागलं. मागील ६ दशकांमध्ये संविधानामध्ये बदल करण्यात आले आहे. जे बीज पंतप्रधान नेहरूंनी पेरले होते. त्यालाच मोठं करण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं. जे पाप नेहरू करून गेले १९७१ मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता, संविधानामध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये काय होतं. आपल्या देशाच्या कोर्टाचे पंख छाटले होते. संविधानानुसार कोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. हे पाप १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं होतं. इंदिरा सरकारला मौलीक अधिकार हिसकवण्याचा अधिकार मिळाला’ असं मोदी म्हणताच लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ सुरू केला.
‘आता तोंडाला रक्त लागलं होतं त्यामुळे ते थांबले नाही. बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक लढवल्यामुळे सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधी यांची उमेदवारी रद्द केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केली. आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं. एवढंच नाहीतर आणीबाणी लावलीच पण १९७५ मध्ये संविधानात संशोधन केलं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यक्षाच्या विरोधात कोर्टात कुणी जाऊ शकत नाही, असा संविधानात बदल केला. त्यामुळे त्यांच्या पापाचा बंदोबस्तही केला. आणीबाणीमध्ये सगळ्यांचे अधिकार हिसकावून घेतले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं होतं” अशी आणीबाणीची आठवणच मोदींनी सांगितली.
‘ही परंपरा इथं थांबली नाही, जी परंपरा नेहरू यांनी सुरू केली, तीच परंपरा पुढे इंदिरा गांधींनी ठेवली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी सुद्धा तेच केलं. सगळ्यांना सन्मान देण्याच्या आव्हानाला त्यांनी आव्हान दिलं होतं. भारतीय महिलेला न्याय देण्याचा अधिकार देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. पण राजीव गांधी यांनी शहाबानो यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या भावनाला नकार दिला. त्यांनी न्यायासाठी लढणाऱ्या महिलेला साथ दिली नाही. त्यांनी कट्टरपंथीयांना साथ दिली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलून टाकला. नेहरूंनी सुरू केलं, इंदिरा गांधी पुढे नेलं आणि राजीव गांधींनी तेच केलं. आता त्यांची पुढची पिढी सुद्धा हेच करत आहे” असंही ते म्हणाले
“मला हे स्वीकारावे लागले पार्टी अध्यक्ष हे सत्ता केंद्र आहे. सरकार हे पार्टीला उत्तर देण्यासाठी बंधनकारक आहे. असं मनमोहन सिंह यांनी एका पुस्तकामध्ये लिहिली होतं. इतिहासामध्ये पहिल्यांदाच संविधानाला ठोस पोहोवण्याचं काम केलं. आता या पिढीने काय केलं तर, संविधानानुसार निवडलेल्या सरकारला एक गैरसंविधानिक नॅशनल अडव्हायजरी बसवली. तिला पीएमओपेक्षा जास्त दर्जा देण्यात आला होता. एवढंच नाहीतर आणखी एका पिढीने देशाची जनता सरकार निवडते. त्या सरकारचा मुख्य नेता कॅबिनेट तयार करतो. पण अहंकाराने भरलेल्या व्यक्तीने ही प्रत पत्रकारांसमोर फाडली. एक अहंकारी व्यक्ती प्रत फाडतो आणि कॅबिनेटने आपला निर्णय बदलून टाकावा, ही कोणती लोकशाही आहे. हे त्या लोकांना वाईट वाटत असेल पण हे सगळं घडलं आहे. काँग्रेसने संविधानाचा अपमान केला, संविधानाचे महत्त्व कमी करण्याचे काम केले आहे” असं म्हणत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
– जरा इतिहासाकडे मागे वळून पाहिलं तर देश संविधानाचे २५ वर्ष पूर्ण करत होत तेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. संविधानाची व्यवस्था नष्ट करण्यात आली. देशाला जेल बनवण्यात आलं. लोकांचे अधिकार हिसकावून घेतले. पत्रकारांचे अधिकार हिरावून घेतले. काँग्रेसच्या माथ्यावर लागलेलं हे पाप कधी पुसणार नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या पापाची चर्चा होईल. संविधान निर्मात्यांची मेहनत मातीत मिळवण्याचा प्रयत्न झाला. हे कधीच विसरलं जाणार नाही.













