मविआला ‘सुपारी गँग’मुळे 8 जागांचा फटका; महाराष्ट्र द्रोह्यांच्या पालख्या वाहण्याचा एककलमी कार्यक्रम सुरुच

0

ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह हवे तितक्या विकाणी पोहोचू शकलो नाही तर निकाल अजून वेगळा लागला असता, असा दावा करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह हवे तितक्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही तर निकाल अजून वेगळा लागला असता, असा दावा करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गेल्या काही दिवसातील भूमिका पहिली तर ठाकरे गटाला विरोधी करणारी राहिली आहे. राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम हा महाराष्ट्रांच्या शत्रूच्या पालख्या वाहण्याचा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

अधिक वाचा  प्रशांत महासागर ‘एल निनो’च्या सक्रियतेचा मोठा फटका; यंदा सरासरीपेक्षा ६६ % पाऊस; महागाई वाढण्याचा धोका

विशेषत ही सुपारी गैंग लोकसभा निवडणुकीत उतरली नसती तर महाविकास आघाडीच्या 30 ऐवजी 38 जागा निवडून आल्या असत्या. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरेंनी 400 जागा लढाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. मविआच्या तिन्ही पक्षांच्या विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांसह इतर धर्मियांचे मतदान शिवसेना ठाकरे गटाला झाल्याने गेल्या काही दिवसापासून मनसेच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

काँग्रेसच्या विजयात शिवसेनेचा हात

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी शिवसेनेने जीवाचं रान केले आहे. त्यामुळे काँग्रेसनं 13 जागा जिंकल्यात त्याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेनेच्या मदतीमुळे काँग्रेसने बाजी मारली. संविधान बदलाचा नरेटिव्ह कधीच खोटा नव्हता, मोहनराव भागवत तेव्हाच का बोलले नाही? आता बोलण्यात काहीही अर्थ नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागांच्या वाटपाची चर्चा आम्ही पक्षाध्यक्षांसोबत करु राहुल गांधीपासून रमेश चैनीचला आहेत, असेही राऊत म्हणाले.

अधिक वाचा  महाराष्ट्र राज्य आता ‘रेड’झोनमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप …यामुळे उष्णतेत वाढ; पुणे जिल्ह्यातही तापमान चाळीशी पार