शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, मतदान केंद्रावर महाराजांच्या वाटत होता चिठ्ठ्या

0

नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

आज सकाळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर यांनी मतदानानंतर ईव्हीएमला हार घातला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता.

शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात

त्यानंतर शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हा सहकारी मतदान केंद्रावर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत होता. याप्रकरणी जनेश्वर महाराजांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हसरूळ पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

काय म्हणाले शांतीगिरी महाराज?

नाशिकसचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजाने आपल्या गळ्यातील ईव्हीएम मशीनला घातला. मात्र आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएम मध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजाकरून वंदन केले हा आदर्श आचारसंहिते उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.