अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

0

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. चंद्रकांत खैरेदेखील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढण्यास इच्छूक आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटात याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे दानवे नाराज असल्याची चर्चा होत आहे. आता दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्यावर अंबादास दानवे यांचं मत काय? अंबादास दानवे काय म्हणाले?

दानवेंना फोडण्याचा प्रयत्न

भाजप आणि शिंदे गटाकडून अंबादास दानवे यांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे गट, भाजपच्या प्रयत्नाला वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केले आहेत. फोन बंद करून अंबादास दानवे यांचे गाठीभेटी दौरा सुरूच आहेत. आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

दानवेंची भूमिका काय?

आज सकाळीही पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हाते म्हणत असतील की त्यांच्या पक्षात येणार आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की, मी जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मी सुस्पष्टपणे सांगत आहे. जे म्हणतात जाणार त्यांना विचारणा करा… हे त्यांचं अपयश आहे. इथे त्यांना उमेदवार भेटत नाही. विशेषतः भाजपचं… ही त्यांची हार आहे, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

आज यादी जाहीर होईल त्याच माझं नाव असणे आणि नसणे हे महत्वाचे नाही. गद्दार राजकारण संपर्क होतो. माझ्या मनात तसूभरही काही नाही . ज्याला तिकीट मिळाले त्याच काम करेल, असं आजच सकाळी बोलताना अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर म्हणाले…

प्रकाश आंबेडकर अजूनही आमच्यासोबत यावेत अशी त्यांची भावना आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेतून फटका कोणाला बसतो हे त्यात परिस्थितीत अवलंबून असते. कोणत्या उमेदवार उभा असतो. त्यावर अवलंबून असते. मनोज जरांगे अपक्ष उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतील असे मला वाटत नाही. कायदेशीर मला माहिती नाही. सब्जेक्ट टू कंडीशन दिलंय त्यांना काही चिन्ह बहाल केलेला नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरही दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. अटल बिहारी वापेयीजींनी सभा घेतली होती. धनगडचं धनगर केले जाईल, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी अटलजींनी दिलेलं आणि फडणवीसांनी दिलेला आश्वासन पूर्ण झालेले नाही, असं दानवेंनी म्हटलं.

अधिक वाचा  महसूल विभागात मोठी भरती! 2122 कोतवाल भरती; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत ही भरती होणार