मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आता पुढच्या महिन्यात वर्षभराचा कालावधी पूर्ण होईल. मागील अकरा महिन्यात शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्त्यावरच्या संघर्षाबाबत न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. मात्र असे असले तरी अजूनही महाराष्ट्रातील अनेकांना वाटतं की, शिंदे आणि ठाकरे पुन्हा कधी एकत्र येतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो.






आज एका खासगी वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली या मुलाखत घेतली होती. या विशेष मुलाखतीत शिंदेंनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुख्यमत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला की,’तुम्ही जे कुटुंब (ठाकरे गट शिवसेना) सोडलंय. तुम्हाला आता वाटत नाही का? कि पुन्हा ‘मातोश्री’वर जावं. त्यांना पुन्हा समजावावं, त्यांना आपल्या सोबत घ्यावं, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण अनेक वर्षांचं तुमचं नातं होतं?’ असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आता संपूर्ण महाराष्ट्र माझं परिवार झालेला आहे. समजावण्याचा विषय असेल तर, मी हा निर्णय घेण्यापूर्वी ठाकरेंना पाच ते सहा वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता,” असे शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे ठाकरे गट एकत्र येण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत.











