गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात नवनवीन माहिती समोर येत आहे. लोणावळा येथील लोहगडावर झालेल्या हत्याकांडात मुख्य आरोपी असलेली सिया गोयल तसेच तिचा सहकारी आरोपी चेतन चौधरी या दोघांना पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांना पोलीस कोठडी वाढवून मिळू नये, यासाठी सियाच्या वकिलांनी तयारी केली आहे. तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केलीये.






एका वाक्यात विषय संपवला
सियाची रवानगी यापुढे येरवडा कारागृह येथे व्हावी, यासाठी सियाच्या कुटुंबीयाकडून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रियंका बराडकर या पुढील न्यायालयीन प्रक्रिया पहात आहे. सियाची बाजू मांडणाऱ्या एडव्हेकेट प्रियंका बराडकर लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रकरणावर एका वाक्यात विषय संपवला. सिया निर्दोष आहे आणि ती निर्दोश सुटेल, असं त्या यावेळी म्हणाल्या. आम्हाला जास्त बोलता येणार नाही. केस कोर्टात आहे, असं म्हणत त्यांनी इतर प्रश्नांवर बोलणं टाळलं.
आम्ही वकील नियुक्त केलाच नाही – सियाच्या वडिलांचा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून ॲड. आशुतोष श्रीवास्तव हे सियाची केस लढवत होते, अशी माहिती माध्यमांसमोर होती. पण आम्ही कोणताही वकील नियुक्त केला नाही, असं सियाच्या वडिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता वकील प्रियंका बराडकर यांची या केसवर नियुक्ती झाल्याचं कळतंय. पोलिसांना चौकशी, माहिती गोळा करणे आणि तपासासाठी पुरेसा पोलीस कोठडी रिमांड आधीच मिळाला आहे. त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्ष करणार आहे.
उज्जवल निकम सरकारी वकील
तर दुसरीकडे, सरकारी वकील म्हणून 49 जणांना फाशीवर चढवणाऱ्या उज्जवल नियम यांची या केसमध्ये नियुक्ती केली आहे. ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीडित कुटुंबीयांच्या विनंतीवरून सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.













