कोथरूड पुनर्विकास प्रकल्प ‘अक्षम्य’ चुका; रिक्षा चालक थोडक्यात बचावला! भाजप पदाधिकाऱ्याचे प्रसंगावधान






कोथरूड पुनर्विकासाचं माहेरघर! मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते झोपडपट्टी जिकडे तिकडे सर्वत्र इमारतींची बांधकामे सुरू असताना पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या सूचना पाळल्या जात नसल्याने असंख्य कोथरूडकारांना आपला जीव मुठीत घेऊन दैनंदिन कार्य कारभार पार पाडावा लागत आहे. भरधाव येणारी अवजड वाहने, रस्त्यालगत पदपथावर बांधकाम व्यवसायिकांचं पडलेलं साहित्य, स्ट्रॉंग मोटर लाईन मध्ये सोडले जाणारे पाणी या सर्व गोष्टी निमुटपणे सहन करणाऱ्या कोथरूडमध्ये आज मात्र इमारतीच्या शेजारून जाणारा रिक्षा चालक दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला. विशेष म्हणजे भाजपा पदाधिकारी दीपक पवार यांनी प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी तत्परता दाखवल्याने रिक्षा चालकाचा जीव बचावला.
पुणे महापालिकेच्या मान्यतेने सध्या कोथरूड परिसरातील एरंडवणे कर्वेनगर कर्वे रस्ता पौड रोड आयडियल कॉलनी या प्रमुख भागांसह सर्वत्र अंतर्गत रस्त्यावरही सध्या पुनर्विकासाचे प्रकल्प जोरदार सुरू आहेत. पुणे महापालिकेच्या नियमावलीनुसार प्रकल्प पूर्ण करण्याची आवश्यकता असतानाही विशिष्ट अधिकारी वर्गांना बरोबर धरून व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली जात आहे. स्थानिक पातळीवर ती नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आल्या तरी सुद्धा पुणे महापालिकेच्या पत विभाग किंवा बांधकाम नियंत्रण बांधकाम व अतिक्रमण अशा कोणत्याही विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. कोथरूड परिसरातील व्यावसायिकामार्फत सर्रासपणे केल्या जाणारा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती ठोस पार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमार्फत केली जात आहे.
एरंडवणा परिसरातील अशाच एका पुनर्विकास प्रकल्प लगत असलेल्या रस्त्यावरून कोथरूड गावातील रिक्षा चालक युवराज शिंदे 206/207 शिवाजी चौक कोथरूड बुधवारी दुपारी जात असताना अचानक 25 ते 30 किलो वजनाच्या फरशीचा तुकडा थेट त्यांच्या रिक्षा वरती पडला आणि डोक्याला मार लागला. घटनास्थळी योगायोगाने भाजपाचे पदाधिकारी दीपक पवार उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ प्रथमोपचाराची सोय करून रिक्षा चालकाचे प्राण वाचवण्याचे काम केले. दीपक पवार यांनी केलेल्या मदतीमुळे रिक्षा चालकाचे प्राण वाचले असले तरीसुद्धा दररोज शेकडो कोथरूडकर याच जास्तीत जगत असल्याची ‘जाण’पुणे महापालिका प्रशासनाला असावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली.
पुणे महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी व व्यावसायिक यांचे लागेबांधे असल्यामुळे कागदावर कडक असलेल्या नियमांची प्रत्यक्षात अंमलबजावणीच केली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागत आहे. कोथरूड परिसरात सुरू असलेल्या सर्वच पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी करून याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे.












