पुणे शहरासाठी किती आणि शेतीसाठी किती पाणी देण्याच ठरवले होते आणि दिले याची एकदा जाहीरपणे तपासणी होणे आवश्यक आहे. ज्यांचे तालुके आणि विधानसभा मतदार संघ आहेत यामध्ये उसाची शेती ही प्रभावी आहे त्या ठिकाणी पाणी जास्त दिले जाते आणि ज्या पुणे शहरात प्रामाणिक टॅक्सपेअर् पुणेकर नागरिक राहतात त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.






पाणी वाटपाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माणसाला प्रथम पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल पाहिजे परंतु आज नेमकं उलट झालेलं आहे आणि एक दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची बचत तर होणार नाहीच उलट जास्त पाणी वापरले जाईल. पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती स्वाभाविकपणे नागरिकांच्या मनामध्ये असते ज्या दिवशी पाणी बंद असते त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी प्रेशरने येईल का नाही ही एक भीती पुणेकरांच्या मनात असते.
कालवा समितीमध्ये काय ठरले ते पुणेकरांना कळले पाहिजे आणि त्याप्रमाणे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी झाली आहे का? पुण्यातल्या सर्व आमदारांनी एकजूट करून विचारले पाहिजे ठरले होते काय आणि झाले काय? पुणेकर मतदार नाहीत का ? असा सवाल उज्वल केसकर माजी विरोधी पक्षनेता पुणे महापालिका, सुहास कुलकर्णी माजी विरोधी पक्षनेता, प्रशांत बधे माजी नगरसेवक यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.












