पुणेकरांनो शहरात सेव्ह वाॅटर मोहीम पाणी जपून वापरा! सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा; महापौरांची घोषणा

0

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, चार धरणांमध्ये केवळ ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी ऑगस्टअखेर राखीव ठेवावे लागणार असल्याने शहरात येत्या सोमवार (१५ जून) पासून दिवसाआड पाणी दिले जाणार आहे.त्यासाठीचे पूर्ण नियोजन करण्यासाठी प्रशासनास पुढील काही दिवस दिले जाणार असून, याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर केला जाणार असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त नवल किशोर राम, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  शिवराज्याभिषेक दिन! एरंडवणे गणेश नगर, लक्ष्मीनगर भागात 51 गणपती मंडळांनी उभारली शिवकश राजदंड स्वराज्य गुढी

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात सरासरीपेक्षा ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची तब्बल ६० टक्के शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. जून महिना सुरू होऊनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नागपुरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून शहराच्या पाणीपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला.

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिवसाआड पाणीकपात लागू करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच शहरात सेव्ह वाॅटर मोहीम राबविली जाणार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

अधिक वाचा  वारजे काळेश्वरी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत सर्रास गावठी हातभट्टी दारू वारजे पोलिसांचा छापा; विषारी रसायनांचा साठा जप्त

“मे महिन्यातील उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पाणी कपातीचा निर्णय टाळण्यात आला होता. मात्र, मान्सून लांबण्याची शक्यता असल्याने उपलब्ध साठा जपण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक झाल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सेव्ह वॉटर मोहिमेला सहकार्य करावे.”

– मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका

पाण्याची सध्यस्थिती आणि पालिकेचे नियोजन

आज अखेर खडकवासला धरणसाखळीत ५ (१७ टक्के) टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील ०.८० टीएमसी पाणी पालखीसाठी सोडले जाणार आहे. काही पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे, तर महापालिकेस दिवसाआड पाणीपुरवठा करायचा झाल्यास या पाण्यातील तीन ते सव्वातीन टीएमसी पाण्याची गरज असेल. महापालिका सध्या धरणातून प्रतिदिन १५५० एमएलडी पाणी घेत असून, ते दिवसाआड कपातीनंतर १ हजार एमएलडी प्रतिदिन घेतले जाणार आहे. त्यामुळे ते शहराला दिवसालाआड दिल्यास प्रत्येक भागास पुरेसे पाणी मिळणार आहे.

अधिक वाचा  बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने गाव व मुंबई कौन्सिल सभा मोठ्या उत्साहात संपन्न