गुहागर दि. ४ (रामदास धो. गमरे) समाजात जनजागृती करण्यासाठी बाबासाहेबांनी कोकण दौरा आखला होता त्यातील पहिला टप्पा दापोली, मंडणगड, खेड,चिपळूण, गुहागर असा होत, १९३८ साली चिखली गावात समाज जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधित केलं होत त्यांच्या पदस्पर्शाने चिखली ही भूमी पावन झाली आहे, बाबासाहेबांचे सुपुत्र, नातू यांची देखील पाऊले याठिकाणी लागली आहेत अशी माहिती संघाचे चेअरमन मोहिते यांनी आताच दिली आहे तरी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिखली मुक्कामी संविधान भवन हे शासनाच्या माध्यमातून करण्याचे मी प्रयत्न करेन” असे प्रतिपादन ना. उदय सामंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना केले. तसेच सुरेश सावंत यांनी सहकारी संघाच्या वतीने जे निवेदन दिले त्याचा ही आपण विचार करू व जो आड वळणी रस्ता आहे तो १०-१५ फूट सरळमार्गी करू असे आश्वासन ही दिले व लगतची १० गुंठे जागा मिळण्यासाठी आपण बसून त्यावर विचार करू अशी सकारात्मक मतं व्यक्त करत त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले व त्या संदर्भात तहसीलदारांना तत्काळ निर्देश केले. बौद्धजन सहकारी संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी त्यांनी तालुका संघाच्या सुरेश सावंत आणि त्यांचे सहकारी आणि मुंबई कार्यकारिणी एकमताने कार्य करीत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे असे गौरवास्पद उद्गार काढून सर्वांना शुभेच्छा दिल्या.






बौद्धजन सहकारी संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्ह उद्घाटन विधानसभेतील बुलंद तोफ कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव आणि विक्रम जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरेश सावंत आणि कार्यकारिणीने जे निवेदन दिले त्याबद्दल त्यांनी विचार करून ती गोष्ट अंमलात आणू असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना डॉ. उदय सामंत यांनी “आपला जनसमुदाय पाहून माझे मन हेलावून जात आहे अशीच आपली संस्था अबाधित रहावी त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिखली येथे संविधान भवन सरकार मार्फत उभारण्याचा प्रयत्न करेल असे मी आपल्याला अभिवचन देतो” असे नमूद केले.
बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या संघाच्या गाव आणि मुंबई शाखेच्या विद्यमाने संघाचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संघाचा अमृत महोत्सव मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी पूज्य भंते विमलबोधी आणि संस्कार समितीने सुमधुर व मंगल वाणीने पूजा पठण संपन्न केले तर अध्यक्ष सुरेश सावंत व माजी अध्यक्ष सुरेश पवार यांनी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाला प्रारंभ केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळवली गावचे सुपुत्र व पेवे विभागाचे विभाग प्रतिनिधी राकेश पवार यांनी आपल्या भारदस्त आवाजात आणि लाघवी भाषाशैलीत केलं तर पाहुण्यांचे स्वागत मुंबई संघाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना मुंबई संघाचे चेअरमन दिपक मोहिते यांनी “गुहागर या नावाची उत्पत्ती “गुहा” (वस्ती/घर) आणि “आगर” (डोंगराळ भाग) या शब्दांपासून झाली असून, पूर्वी डोंगरातील गुहांमध्ये भिक्खू संघाची वस्ती असल्यामुळे या ठिकाणाला गुहागर हे नाव प्राप्त झाले.
समाजातील अन्याय, भेदभाव दूर करून शिक्षण, एकता व स्वाभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने १९५१ साली दलित सहकारी संघाची स्थापना झाली, ज्याचे पुढे बौद्धजन सहकारी संघ असे नामांतर झाले.
काळाच्या ओघात संघाची गती मंदावली असली तरी नवीन तरुण पिढीने पुढाकार घेत संघाला नवसंजीवनी दिली आणि कार्य पुन्हा प्रगतीपथावर आणले. संघाने कव्वाली व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली, ज्यात अनेक कलाकारांनी मोठे योगदान दिले. या अमृत महोत्सवी वर्षात योगदान देणाऱ्या कार्यकर्ते व कलाकारांना मरणोत्तर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे तसेच अमृत महोत्सवी कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून गाव आणि मुंबई कमिटी एकत्र येऊन कार्यक्रमाचा आराखडा आणि रूपरेषा जाहीर करू” असे नमूद केले व प्रास्ताविक सादर करताना बौद्धजन सहकारी संघाचा ७५ वर्षाचा आढावा त्याची जडणघडण आणि अश्वाच्या वेगाने उत्तरोत्तर प्रगती होत चाललेल्या कार्याचा आढावा मांडत असताना गाव आणि मुंबई या दोन्ही कमिटी हातात हात घेऊन एकत्रितपणे संघाचे कामकाज पुढे नेऊ असे ही नमूद केले.
सदर प्रसंगी गुहागर नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरच्या उपसभापती नीलिमा विकास मालप, गुहागरचे उपसभापती नितीन सुर्वे, माजी आमदार विजय नातू, प्रमुख विश्वस्त पांडुरंग गमरे, मनीष गमरे, माजी विश्वस्त संजय पवार, के. सी. जाधव, शैलेंद्र पवार यांनी आपले विचार मांडत असताना बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने आपली पतसंस्था आपण निर्माण केलेली आहे आणि ती वर्षभराच्या काळातच अश्वाच्या वेगाने आगेकूच करत आहे त्यात आपण ही सहभागी व्हावं अशी विनंती केली. त्याचबरोबर प्रदीप कदम, सुरेश पवार, अनुराग जाधव, एम. डी. मोहिते, हेमंत भेकरे, महेंद्र कदम, संदीप गमरे, अविनाश कदम, वैभव गमरे, दीपाली गमरे आदींनी आपले मौलिक विचार मांडले.
सदर कार्यक्रमास शशिकांत सुर्वे, सचिन गमरे, अरविंद जाधव, मनोहर मोहिते, धर्मानंद जाधव, संजय तांबे, दीपक सावंत आदी कार्यकर्ते मुंबईहून उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणात सुरेश सावंत पुढे म्हणाले “तालुका संघाचा गेल्या ७५ वर्षाच्या कार्याचा आढावा घेत, जडणघडणीची बरीचशी माहिती त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या. सोबतच उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव हे उपस्थित होते त्यांचे आभार व्यक्त करताना त्यांना विनंती केली की स्मारक असताना याठिकाणी पायवाट होती म्हणून आम्हाला येण्या जाण्याची जागा होती परंतु जिल्हा परिषदेने याच ठिकाणी शाळा बांधून जागा कशी अडवली ते आम्हाला कळलं नाही, आताचा रस्ता आड वळणी आहे त्यामुळे सरळ मार्गी १५ ते २० फुटाची जागा रस्ता म्हणून बाजूने आम्हाला देण्यात यावी अशी विनंती केली. त्याचप्रमाणे आजूबाजूला मोठ मोठे टॉवर उभे राहिले आहेत आणि त्या लगतची आमची जागा एमआयडीसी मध्ये बरीचशी जागा गेली आहे त्यावर त्यांनी बांधकाम केले आहे तरी त्यांची २०-२५ गुंठे जागा पडीक आहे त्यातील १० गुंठे जागा आम्हाला शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी जेणेकरून आमची जागेची अडचण दूर होईल तसेच नुकतीच महिला मंडळाची बैठक झाली त्यात महिलांनी असा ठराव घेतला की जर आम्हाला शासनाच्या माध्यमातून ही जागा भेटली तर आम्ही गरीब असलो तरी आमचा एक दिवसाचा रोज देऊन आपण स्वतः इमारत बांधायचा प्रयत्न करू म्हणून आम्हाला जागा मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली त्या अनुषंगाने डॉ. उदय सामंत साहेबांनी ही जागा संदर्भात सकारात्मक विचार करून आपण त्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमास मुंबई आणि गाव या दोन्ही संघटनेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी मध्यवर्ती कमिटी, विभाग अधिकारी, विभाग कमिट्या, उपसमित्या, सभासद, कार्यकर्ते आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी राकेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












