पश्चिम बंगालसह 5 राज्यांचे सर्व एक्झिट पोल समोर, येथे आहे काटे की टक्कर येथे उलटफेर तर जनकौल काय?

0

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होताच आता 5 ही राज्यांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला 146 ते 161 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर तृणमुल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप मॅजिक फिगर गाठेल असा अंदाज आहे. तर या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येताना दिसत आहे.

अधिक वाचा  ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची नवी भूमिका आत्ता महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही

चाणक्यचा एक्झिट पोल देखील आता समोर आला आहे. चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागंवरच समाधान मानावं लागणार आहे. तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आसाममध्ये काय स्थिती?

आसाममध्ये पुन्हा एकदा एनीडीएची सत्ता येताना दिसत आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर काँग्रेसला 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. याचा अर्थ एक्झिट पोलच्या अंदानुसार भाजप पुन्हा एकदा आसाममध्ये आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार आहे.

अधिक वाचा  तथागत गौतम बुद्ध म्हणतात की सजीव आणि निर्जीव दोन्ही अनित्य आहेत – संदीप गमरे 

केरळमध्ये धक्कादायक निकाल

केरळमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केरळमध्ये डाव्या पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये एलडीएफला 49 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस आघाडीला 78 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा येण्याची शक्यता आहे. एक्सिस माय इंडियाचा हा एक्झिट पोल आहे.