IMF अहवालाचा भारताला झटका! जागतिक अर्थव्यवस्थेच्या टॉप 5 मधून बाहेर; हे मोठे कारण आहे?

0

अमेरिका-इराण युद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक आर्थिक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारत सध्या जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या वर्षी काही काळासाठी भारत चौथ्या स्थानावर असल्याची चर्चा होती, मात्र आता क्रमवारीत बदल झाला आहे.

IMF च्या आकडेवारीनुसार भारताचा सध्याचा GDP सुमारे 2.25 ट्रिलियन डॉलर इतका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्यामुळे जागतिक स्तरावर भारताची स्थिती काहीशी प्रभावित झाली आहे. डॉलर मजबूत होणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. यामुळे आयात महाग होत असून व्यापार तुट वाढत आहे. त्यामुळे आता भारतीयांसाठी बाहेरून येणाऱ्या वस्तू महाग होताच आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार

कोणते देश भारतापुढे?

IMF च्या आकडेवारीनुसार जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर कायम आहे. खालील देश भारताच्या पुढे आहेत.

  • अमेरिका
  • चीन
  • जपान
  • जर्मनी
  • युनायटेड किंगडम
  • भारत

या नव्या आकडेवारीमुळे तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे स्वप्न आता पुन्हा लांबले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतासमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. एक म्हणजे GDP वाढ 7-8% दरम्यान टिकवून ठेवणे आणि दुसरे म्हणजे रुपयाची घसरण नियंत्रणात ठेवणे.

अर्थव्यवस्थेबाबत अंदाज

S&P Global Ratings च्या अंदाजानुसार, इराण युद्धासारख्या जागतिक तणावाच्या परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 130 डॉलरपर्यंत गेली, तरीही भारताची अर्थव्यवस्था सुमारे 6.3% दराने वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

पण जर कच्च्या तेलाचा दर सुमारे 85 डॉलर प्रति बॅरल राहिला, तर 2026-27 मध्ये भारताचा विकासदर 7.1% पर्यंत जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, ही वाढ इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अजूनही मजबूत आहे. त्यामुळे भविष्यात भारताची अर्थव्यवस्था भरभराट करू शकते.