मंत्रालयात उसळणाऱ्या गर्दीचा करेक्ट कार्यक्रम? ‘या’ स्वीय सहायकांना प्रवेश नाही; मंत्र्यासोबतही केवळ एक…

0

मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उसळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर अखेर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादत मंत्र्यांसोबत येणाऱ्या गर्दीला एक प्रकारे चाप लावला आहे.आता एका मंत्र्यासोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका व्यक्तीलाच मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश मिळणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व मंत्री आणि विभागांनाही देण्यात आल्या आहेत.

मंत्र्यांची भेट घेणे, मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी कार्यकर्ते मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहतात. बैठकीनंतर मंत्र्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह प्रस्तावातील संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. याव्यतिरिक्त इतरांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहणे अभिप्रेत नाही. असे असले तरी मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचाऱ्यांची आणि अभ्यागतांची उपस्थिती असल्याने कामकाजात अडथळा निर्माण होतो, असे मुख्य सचिवांनी पत्रात नमूद केले आहे.

अधिक वाचा  प्रशांत महासागर ‘एल निनो’च्या सक्रियतेचा मोठा फटका; यंदा सरासरीपेक्षा ६६ % पाऊस; महागाई वाढण्याचा धोका

बैठक संपेपर्यंत स्वीय सहायकांना प्रवेश नाही

– बैठकीला मंत्र्यासोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका व्यक्तीस प्रवेश द्यावा, कार्यालयातील इतर कोणतीही व्यक्ती किंवा अभ्यागतांना परवानगी असणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

– अन्य कोणाला बैठकीला उपस्थित राहायचे असल्यास मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्ष (मुख्यमंत्री) यांची पूर्वपरवानगी असलेली कागदपत्रे मुख्य सचिव कार्यालय आणि संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यास सादर करावीत.

– मंत्रिमंडळ बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह या ठिकाणी असल्यास केवळ आमदार-खासदारांना प्रतीक्षाकक्षात प्रवेश द्यावा, मंत्रिमंडळ बैठक सुरू व समाप्त होईपर्यंत आमदार व खासदार यांचे स्वीय सहायक यांस बैठकीच्या परिसरामध्ये प्रवेश प्रतिबंधित करावा. बैठकीपूर्वी आणि नंतर २ तास सह्याद्री येथील मंत्रिमंडळ सभागृह परिसरात किंवा मंत्रालय ७ व्या मजल्यावर कोणतीही बैठक आयोजित करण्यात येऊ नये, असे काही निर्बंध अग्रवाल यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

अधिक वाचा  तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण…, प्राजक्त तनपुरेंच्या या वक्तव्याने नवी चर्चा, शरद पवार गटाचीही पहिली प्रतिक्रिया