पाच राज्य निवडणुक तारीख जाहीर! 824 मतदारसंघ 17.4 कोटी मतदार; 2.5 कोटी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारीही तैनात

0

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.15 रविवारी) दुपारी आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. यासाठी आयोगाने आज संध्याकाळी 4 वाजता एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यामध्ये मतदानाचे टप्पे, तारखा आणि निकाल कधी लागणार, याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पाचही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यांत संपत असल्याने त्यापूर्वी नवीन सरकार निवडणे घटनात्मकदृष्ट्या आवश्यक आहे. या घोषणेसोबतच संबंधित राज्यांमध्ये आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आता या निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे. या निवडणुकीत 824 मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच एकूण मतदान हे 17.4 कोटी असतील असं निवडणूक आयोग प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं आहे. मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत सर्व गोष्टींसाठी जबाबदार असलेले सुमारे 2.5 कोटी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जातील, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  RTE कायद्यातील या तरतुदीवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय; राज्य सरकारची भूमिका संविधान विरोधी

बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणुकीची घोषणा

याशिवाय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा देखील केली. यामध्ये बारामती आणि राहुरी या मतदारसंघाचा समावेश आहे. बारामतीचे आमदार अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आली आहे, येत्या 23 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच याचा निकाल हा 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 30 मार्च रोजी अधिसुचना निघणार. तसेच 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, 7 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार, तर 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आणि 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार.

अधिक वाचा  एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण आणि राजकीय रणधुमाळीला वेग

निवडणुकीच्या या मोठ्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने आधीच तयारी पूर्ण केली असून, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर सर्व चार राज्ये आणि पुद्दुचेरीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन आणि तरुण मतदारांची नोंदणी झाल्यामुळे यावेळी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता संघर्ष तीव्र होण्याची शक्यता असून, दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळमधील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर उमेदवारी अर्ज भरणे आणि प्रचारसभांचा धडाका सुरू होईल, ज्यामुळे देशातील राजकीय वातावरण आगामी काही दिवसांत पूर्णपणे तापलेले पाहायला मिळेल.

अधिक वाचा  महिला मुक्ती दिनाचं श्रेय खऱ्या अर्थानं बुद्ध कालीन महाप्रजापतीला जाते – प्रा. आशाताई कांबळे