भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून बाणेर बालेवाडी परिसराचा उदय झालेला असताना काही ‘स्व:हितार्थ’भूमिका घेत पक्षाची निष्ठा पायदळी तुडवली; त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धोरणात्मक निर्णय घेऊन संघ विचाराला अर्पित आयुष्य जगलेल्या नेतृत्वाला संधी दिली आहे. त्याग, समर्पण आणि सातत्य ही संघ विचाराची विचारसरणी अंगीकृत करून लहू बालवडकर यांनी भारतीय जनता पक्ष ‘भाजपा तुमची आमची सर्वांची!’ या समर्पित भावनेने बाणेर बालेवाडी परिसरामध्ये कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीने याच कामाची पावती म्हणून उमेदवारी दिल्याने तिळपापड होत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका केली जात आहे. स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र याकडे डोळेझाक कडून जनसेवा आणि जनसंवाद अशी संवादी व नम्र भूमिका घेत असतानाच मितभाषी लहू बालवडकर हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नागरिकांच्या पसंतीस पडत आहे.






प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सुतारवाडी पाषाण सुस म्हाळुंगे सोमेश्वरवाडी प्रभागातील सातही गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची पक्की बांधणी असून सर्वत्र या नव्या संघीय नव्या चेहऱ्यांच्या या पॅनलचे स्वागत केले जात आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीनुसार समर्पण त्याग आणि सातत्य या तिहेरी तत्त्वांना लहू बालवडकर यांनी प्राधान्य दिल्यामुळे परिसरामध्ये 25 ते 30 वर्षापासून समर्पण आणि त्यागी भूमिकेत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी प्रचारात सक्रिय झाली आहे. प्रभागातील सातही गावांमध्ये पक्षाची विचारधारा पक्की असतानाही आपणच ‘भाऊबली’ अशी दिवा स्वप्न अनेकांना वाटू लागली. भ्रमनिराशेनंतर आत्ता त्यांच्यातील वाचाळवीर जागा झाला असून रात्रंदिवस गरज ओळखण्याचे काम करत असताना नम्र संवादी आणि मितभाषी नेतृत्व म्हणून लहू बालवडकर यांच्याकडे जनमताचा कौल वाढत आहे.
विरोधकांकडे कार्यकारणी आणि कार्यकर्त्यांची मानवा असल्यामुळे हेतूतहा वातावरण कुलूषित करण्यासाठी आवाक्याबाहेरील ‘दंड बैठका’ सुरू असतानाच लहू बालवडकर यांनी मात्र जनसेवी भूमिका घेत जनसंवाद सुरू ठेवल्याने प्रभाग 9 मध्ये विनम्र आणि आक्रस्थळे अशा दोन नेतृत्वाची तुलना करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पसंती वाढण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने संधी देताना निष्ठावान कार्यकर्त्यांची समजूत काढत यांना उमेदवारी दिली; यावेळी सुद्धा अनेक निष्ठावानांवर अन्याय, अनेकांना अन्य उमेदवार अशा तडजोडी कराव्या लागल्या होत्या. परंतु त्याग समर्पण आणि सातत्य ही मूलभूत भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे सर्वांनी एकत्र येत भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे काम केले. आजही याच कार्यकर्त्यांनी एक एकनिष्ठपणे नव्या दमाच्या उमेदवारांसाठी एल्गार पुकरला आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने या परिसराचा स्मार्ट सिटी म्हणून विशेष गौरव केलेला आहे परंतु या भागातील नेतृत्व खरंच स्मार्ट आहे का? नव मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना शक्य आहे का? हे यक्ष प्रश्न असतानाच नियतीने योग जुळवत आणून विशेष म्हणजे बाहुबली धाटणीचे दोन्ही चेहरे एकत्र विरोधामध्ये समोर आणल्याने परिसराला पूर्णतः मोकळा श्वास देण्यासाठी तत्त्वनिष्ठ मतदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व संपूर्ण भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी सज्ज झाली आहे. ‘घरोघरी दारोदारी तुमची आमची भाजपा सर्वांची’ असा उत्साही प्रतिसाद सार्थकी लावण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाली असून ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नव्या दमाच्या तरुण फळीने यंदा या धाटणीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम असा दृढ संकल्प केला आहे.











