वारजे माळवाडी आणि खडकवासला मतदारसंघ स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे यांची कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला विजय म्हणून या मतदारसंघाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले; परंतु रक्ताचा वारसा दारोदारी फिरत असताना मनसैनिक मात्र विचारांच्या वारश्यावर अहोरात्र काम करत आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग ३२ मध्ये हेच निष्ठावानाचे पॅनल जनमतासाठी घरोघरी जात असतानाच मतदारही अभिमानाने म्हणत आहेत आमचे ठरलेय! प्रभागातील घरोघरी आणि दारोदारी पक्षाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री दांगट, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख यांना मिळणारा प्रतिसाद ही निष्ठेची पावती असून मतदार राजा विचारांनाच प्राधान्य देणार अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.






खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर प्रथम आमदार म्हणून या भागातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रथम गुलाल देऊन मनसैनिकांच्या कष्टाची चीज देखील केले होते. परंतु स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या विचारांशी फारकत घेत त्यांचे रक्ताचे वारसदार राजगादीसाठी विविध पक्षांचे उंबरठे झिजवत असताना मनसैनिक मात्र त्याच विचारांची जोपासना करत जनमताचा कौल मागत आहेत. स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या विचारांचा वारसा बाजूला ठेवून भविष्याची दिवास्वप्न रंगवणाऱ्या लोकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याचा संकल्प निष्ठावान मनसैनिकांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावानाचे पॅनल म्हणून जनमतासाठी घरोघरी जाणारे अधिकृत उमेदवार भाग्यश्री दांगट, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख यांच्या यांच्या साथीला मनसैनिकांची तगडी फौज सक्रिय झाली असून आचार आणि विचारात फक्त राज साहेब या एकाच व्यक्तीने या प्रभाग 32 मधील प्रचाराची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. वारजे शिवणे परिसरातील नागरिकांचाही रेल्वे इंजिन चिन्हाला मिळत असलेला उदंड प्रतिसाद प्रचिती देत आहे.
वारजे माळवाडी परिसर सध्या वाहतूक कोंडीने त्रस्त असून राज साहेबांच्या ब्लू प्रिंट प्रमाणे या भागाचा विकास झाला तरच या भागात ‘विकासगंगा’ सुरू राहील याची प्रचिती मतदारांना होत आहे. 20 20 वर्षे सत्ता भोगूनही निष्क्रिय असलेल्या जनप्रतिनिधींचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा संकल्प मतदारांच्या मनी असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्षम उमेदवार त्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र प्रचारांमध्ये दिसत आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी कायम एकनिष्ठ ही अभिमानाची बाब तत्त्वनिष्ठ मतदारांच्या पसंतीस फक्त आणि फक्त एकच नारा सुरू झाला आहे ते म्हणजे आमचं ठरलंय.!











