सोनेरी आमदारांच्या गावात मनसे उमेदवारांवर प्रतिसादाचा पाऊस; मनसैनिकही भारावले

0

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक ‘कोलांटउडी’ घडलेला प्रभाग म्हणून वारजे-पॉप्युलरनगर प्रभागाची निंदनीय ओळख असली तरीही या दलदलीमध्ये कायम एकनिष्ठ राहिलेले मनसैनिकांचे माजी नगरसेविका भाग्यश्री कैलास दांगट यांच्या नेतृत्वातील पॅनल नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे यांच्या अहिरे गावात याच एकनिष्ठेची प्रचिती आली. मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांच्या मनात आजही स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या विषयी असलेला जिव्हाळा आणि आपुलकी यामुळे अहिरे गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पोस्ट आज स्थानिकांनी प्रतिसादाचा पाऊस पाडत मनसैनिकांचे उत्साही स्वागत केले.

अधिक वाचा  CJPच्या मोहिमेनंतर मोठा निर्णय सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; फोटो व्हिडिओ काढण्यासही बंदी, माध्यमिक शिक्षण संचालकांचे पत्रक

वारजे शिवणे परिसरामध्ये आगळी- वेगळी पक्षांतरे करून अनेकांनी आपले हित साध्य करण्यासाठी निष्ठेची अवहेलना केलेली असताना राज साहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी एकनिष्ठ राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांना मात्र नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. परिसरामध्ये अन्य दोन्ही पक्षांनी केल्याने प्रचाराचा वेग वाढवला असला तरीसुद्धा एकनिष्ठ ही अभिमानाची बिरुदावली फक्त मनसे उमेदवारांकडेच असल्याने नागरिकांच्या पसंती वाढत असून उमेदवारांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले जात आहे. वारजे शिवणे परिसरामध्ये अन्य उमेदवार फक्त राजगादीचा विचार करत असताना एकनिष्ठ पॅनल फक्त आणि फक्त परिसराचा विकास करण्याचे आश्वासन आणि कायम जलसंपर्क कायम ठेवत जनसेवा हेच अंतिम ध्येय! वचन देत असल्याने नागरी प्रतिसाद विजयाकडे घौडदौड करत आहे. प्रभाग 32: वारजे-पॉप्युलरनगर प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावानाचे पॅनल म्हणून जनमतासाठी घरोघरी जाणारे अधिकृत उमेदवार भाग्यश्री दांगट, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश

ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्रात निष्ठेचे नवे समीकरण तयार केल्याने वारजे परिसरात शिवसैनिक व मनसैनिक ‘शिवयुती’च्या सर्वच कार्यकर्त्यांनी गांभीर्याने प्रयत्न सुरु केल्याने प्रभागाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. एकनिष्ठांचा विजय करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले असून वाढता जनप्रतिसाद आता या प्रभागात रेल्वे इंजिन विजयी होण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.