पुणे शहरातील सर्वात प्रतिष्ठित निवडणूक म्हणून सूस बाणेर- पाषाण प्रभाग क्रमांक ९ लढत पाहिली जात असताना आज भाजपच्या बंडखोराच्या साथीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कृपा लाभल्याने प्रभागाची गणिते बदलली आहेत. दस्तरखुद्द अजित दादा पवार यांच्या साक्षीनेच बाहुबली माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ‘इतिहास साक्षीदार आहे’ म्हणत आयोजित केलेल्या ‘4.0’च्या विजयी संकल्प सभेत मोठी मोठी लक्तरे आरोप आणि बरच काही निघण्याची शक्यता आहे! महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सध्या प्रभाग ९ मध्ये २२ उमेदवार उतरले असले तरीसुद्धा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीतीलच मित्र पक्षांचे उभे बंड चर्चेचा विषय बनला आहे. प्रभागातील अटीतटीच्या लढतीमध्ये भाजप बंडखोरांना थंड करण्यात यश आले असले तरी मुख्य लढतीतून कोणते आरोप होतात यामुळे सर्वांची धडधड वाढली आहे.






पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व लक्ष्य प्रभाग क्रमांक ९ मधील लढतीकडे लागलेली असताना आरंभही प्रचंड! भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुरब्बी राजकारणी बाबुराव चांदेरे व होतकरू बाहुबली युवा चेहरा अमोल बालवडकर यांच्या वतीने भव्य दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून विक्रमी ‘लाडक्या बहिणी’च्या उपस्थितीमध्ये अजितदादा यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या प्रतिष्ठेचा विषय लक्षात घेऊन ज्येष्ठ नेतृत्व राहुल बालवडकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन शुभ संकेत दिलेला आहे. यत्र तत्र सर्वत्र! 4.0 ची चर्चा सुरू करण्याचा संकल्प कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केल्यानंतर प्रचाराच्या पुढच्या टप्प्यामध्ये अजितददांच्या साक्षीने विजय संकल्प आयोजित केला आहे.
भारतीय जनता पक्षाने विशाल गांधीले, लक्ष्मी दळवी, ऐश्वर्या कोकाटे यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपला एकजुटीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाणेर बालेवाडीतील विजयाची गणिते जुळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जंग-जंग पछाडत असताना राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व राष्ट्रवादी पुणे शहर कार्याध्यक्षा पूनम विधाते यांनीही एकत्र येत बंडखोरी केली आहे. या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार गटातून जयेश मुरकुटे यांनीही दगडी लढत देण्याचा केलेला संकल्प राष्ट्रवादीसाठी पूरक की मारक हे आगामी काळात ठरणार आहे. यामुळे प्रभाग क्रमांक ९ ब गट व क गटामध्ये लढती चुरशीच्या होणार असल्याचे लक्षात येत आहे.
अपक्ष उमेदवारांचा फायदा पक्षाचे उमेदवाराला होणार की पक्षाच्या उमेदवारांचा फायदा अपक्षला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अमोल बालवडकर हे भाजपमधून राष्ट्रवादी आल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांचा किती फायदा राष्ट्रवादीच्या प्रभागाला होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात दिसणार असणार आहेत, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.










