मुसळधारसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

0

काहीशी विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून शुक्रवार सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पावसाची अंदाज देत परिणामी वाहतुकीला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून शहर आणि त्याच्या उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून तथापि, कोकण भागात पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणावर गदा, राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; हा नियम सर्व ‘स्थानिक’ला लागू होणार का?

या भागात अलर्ट

आज सकाळपासून मुंबई आणि त्याच्या उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार आणि वर्धा या १० जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भरतीचा इशारा

दरम्यान, शनिवारी (ता. २०) रोजी समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा दिला आहे. सकाळी १०:३८ वाजता ४.१५ मीटर उंचीच्या लाटा येणार असून रात्री १०:५२ वाजता ३.८२ मीटर लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर आज शुक्रवारी सायंकाळच्या ४:४६ वाजेच्या सुमारास १.३० मीटर खोलीसह कमी भरतीची पातळी अपेक्षित असून शनिवारी पहाटे ४:४४ वाजता पुन्हा समुद्राची पातळी ०.९६ मीटर पर्यंत कमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

अधिक वाचा  IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं Tata Sierra कारसह ५ पुरस्कार जिंकले मूर्ती लहान, कीर्ती महान! 

या भरतीच्या वेळेत पाऊस पडल्यास सखल किनारी भागात स्थानिक पातळीवर पाणी साचू शकते. त्यामुळे नागरिकांना शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रवास करताना, विशेषतः भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच समुद्राच्या पातळीत चढ-उतार होत असल्याने मच्छिमारांनाही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या पाणलोट क्षेत्रात वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा १४,३३,१२१ दशलक्ष लिटर आहे, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या ९९.३२ टक्के आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात कधी येणार मुसळधार पाऊस?; IMD कडून पुढील 15 दिवसांचा अंदाज व्यक्त

बीएमसी दररोज अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, वेहार आणि तुळशी तलावांमधून पिण्याचे पाणी पुरवते. यापैकी तानसा येथे ९८.९३ टक्के, मोडक सागर ९९.७८ टक्के, मध्य वैतरणा ९८.९९ टक्के, अप्पर वैतरणा ९९.१५ टक्के, भातसा ९९.४३ टक्के, वेहार १०० टक्के आणि तुळशी १०० टक्के पाणीसाठा आहे.