शेअर मार्केट ही बाबासाहेबांनी दिलेली देणं आहे – अमोल कदम

0

मुंबई दि. ६ (रामदास धो. गमरे) “जुलै १९१७ साली लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सची एक वर्षाची शिष्यवृत्ती संपल्यानंतर बाबासाहेबाना भारतात यावे लागले, भारतात परतल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात दीडशे रुपयात नोकरी पत्करली परंतु अस्पृश्य असल्याने बाबासाहेबांना अनेक पेच प्रसंगाला तोंड द्यावे लागले अनेकदा मानहानी सहन करावी लागली म्हणून ती नोकरी सोडून बाबासाहेब डिसेंबर १९१७ ला मुंबईत दाखल झाले. येथे त्यांनी सुरवातीला दोन पारशी मुलांना शंभर रुपये फी मध्ये ट्युशन घेऊ लागले पुढे त्यांनी स्टॉक्स अँड शेअर ऍडवायझर नावाची कंपनी स्थापन केली त्यातून त्यांनी सर्वांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला. त्यातून त्यांनी आर्थिक नियोजन करून गुंतवणुकीवर भर दिला व आर्थिक धोरणाचे फार मोठे काम त्यांनी केले आहे. तोच आदर्श घेऊन मी देखील देशात व विदेशात दोन कंपन्या निर्माण केल्या आहेत आणि जवळजवळ ५०-६० कर्मचाऱ्यांसाठी रोजगार निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात कल असेल त्यात आपल प्रभुत्व निर्माण करून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे न्या” असे प्रतिपादन शास्ता दिनदर्शिका व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना उद्योजक अमोल कदम यांनी केले.

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण

बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नगिरी या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर, पदविकाधर, इंजिनिअर, UPSC, MPSC अश्या परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शास्ता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आणि आपल्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून यश संपादन करणाऱ्या कोकणकन्याना भिमकन्या गौरव पुरस्कार – २०२५ अश्या संयुक्त आघाडी सोहळ्याचे आयोजन संघाचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह भोईवाडा परेल मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल कदम व पाहुण्यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली तद्नंतर मनोज पवार, संदीप गमरे यांनी आपल्या गोडवाणीने धार्मिक पूजा पठण केले त्यानंतर सरचिटणीस संदेश गमरे यांनी आपल्या पहाडी व धीरोदत्त आवाजात व लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले. चेअरमन दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना बौद्धजन सहकारी संघाच्या गेल्या सात आठ वर्षाच्या कार्यकालचा आढावा घेत आजवर राबविण्यात आलेले उपक्रम, श्रामनेर शिबिर, शास्ता दिनदर्शिका आदी उपक्रमातून संघाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न विद्यमान कमिटीच्या मार्फत करण्यात आलेले आहे अजून हि अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार असून त्याद्वारे ही संघाला अजून भक्कम करण्याचे काम करण्यात येईल यात आमच्याकडुन काही चुका ही झाल्या असतील त्यात आम्ही नक्कीच सुधारणा करून संघाची ही घोडदौड अशीच गतिमान करण्यासाठी कंबर कसली आहे त्यासाठी आपण ही आम्हास मदत करावी, २०२६ साली संघाला ७५ वर्षे पूर्ण होत असून येणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी” असे आवाहन केले. तद्नंतर प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, पांडुरंग गमरे, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, न्यायदान कमिटीचे माजी अध्यक्ष शशिकांत मोहिते, उत्तमराव जाधव, धम्मसेन तांबे, माजी विश्वस्त एस.बी.जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, दीपक जाधव, के.सी.जाधव, संजय तांबे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संघाला मंगलकामना देत शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सदर प्रसंगी निधी राजेश पवार (वरवेली) हिने भारतात CS परीक्षेत १लाख परीक्षार्थींमधून २४ वा नंबर पटकावला, डॉ. मधुरीमा अनंत जाधव (आवरे) हिने मत्स्य विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, सुषमा विजय जाधव (आवरे) यांनी न्यायाधीश म्हणून परीक्षा उत्तीर्ण होऊन कार्यभार स्वीकारला, डॉ. धनश्री केशव जाधव (मळन) यांनी BHMS पदवी संपादन केली, पूनम संजय मोहिते (कौंढर) हिने राज्यस्तरीय रग्बी मैदानी खेळात नेतृत्व केले, रिया मनोहर जाधव (गुहागर) हिने हिंदी वकृत्व स्पर्धेत भारतात चौथा क्रमांक पटकावला अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोकण कन्याना “भीमकन्या गौरव पुरस्कार – २०२५” देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सर्व विभाग अधिकारी, आजी माजी मध्यवर्ती कमिटी, उपसमित्या त्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे सरचिटणीस संदेश गमरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  कृष्णा आंधळे फरार तरीही तो तीनदा गावात…. बीड पोलीस करताय काय? धनंजय देशमुखांचा मोठं विधान