महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आनंदराज आंबेडकरांचा महामोर्चा मंत्रालयावर धडकणार

0

मुंबई दि. ४ (रामदास धो. गमरे) ज्याठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्याठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराची निर्मिती केली व पुढे जाऊन ते वैश्विक समता, बंधुता, मानवतेचे केंद्रबिंदू झाले असे जगभरातील बौद्धांचे श्रद्धस्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी.एम.सी. ऍक्ट १९४९ या जुलमी कायद्यामुळे महाबोधी महाविहारावर सध्या ब्राम्हणांनी अतिक्रमण केले असून तेथे बौद्धधम्माची व बौद्ध मूर्तींची अवहेलना होत असून तिथे बौद्ध धम्मास अमान्य अशी वैदिक कर्मकांड होतात म्हणून अधिनियम बी.टी.एम.सी. ऍक्ट १९४९ चा अमानवी कायदा रद्द करून सदर महाबोधी महाविहार मुक्त व्हावे आणि ते बौद्धांच्या ताब्यात यावे याकरता भारत व जगभरातील भन्तेजींच महाआंदोलन सुरू आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी यांना हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर २८ मते कमी; इतर 2 विधेयकेही मागे घेतली

सदर महाआंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तमाम बौद्ध अनुयायांचा महामोर्चा शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० राणीची बाग येथून आझाद मैदान, मंत्रालय आगेकूच करीत निळे वादळ सरळ मंत्रालयावर धडक देणार आहे.

सदर महामोर्चास महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांनी, धार्मिक, सामाजिक, राजकीय, विविध संघटनांनी आणि बौद्ध अनुयायांनी आपले परस्परातील मतभेद बाजूला सारून बौद्ध म्हणून लाखोंच्या संख्येने या महामोर्चास सहभागी होऊन महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

अधिक वाचा  संसदेचं विशेष अधिवेशन वादळी? हे ४ पक्ष ठाम राहिल्यास तर अशक्य; सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा घेणार?