दुःख कमी होत नाही, वाढत चाललेय; मुख्य आरोपी अद्यापही फरार न्यायासाठी कोणते दार ठोठवायचे? देशमुख कुटुंबाचा आर्त सवाल

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येने बीड जिल्ह्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्र हादरला. देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण होत आहेत. पण दु:ख कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे, न्यायासाठी कोणतं दार ठोठवायचे असा आर्त सवाल संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला होता. या घटनेला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड समोर आलेला नाही. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडीसह एसआयटी करत आहे. मागील दोन महिन्यांपासून देशमुख कुटुंबीय न्यायासाठी धडपड करत आहेत.

अधिक वाचा  किशोर साळवी यांचा टेनिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र पोलिसांकडून गौरव

देशमुख कुटुंबाचा आर्त सवाल…

धनंजय देशमुख यांनी म्हटले की, माझे दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चालले आहे. न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत. मात्,र माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणते दार ठोठवायचे वेदना भयानक असल्याचे त्यांनी म्हटले. धनंजय यांनी म्हटले की, कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

धनंजय देशमुख यांनी म्हटले, आरोपींना अभय देत गेला म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल सुरूच होते. कोणतेही मोबाईल स्ट्रेस केले नाही. ही सहजपणे गोष्ट घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. शोध होत नाही म्हणून म्हटलं जात आहे. गु्न्हेगाराला अभय दिल्याने मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुखांनी म्हटले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक ललीत जैन यांची सखी-सुखदाला चिरस्मरणीय भेट