एनडीएची देणार कायम साथ की येणार शरद पवारांच्या गटात? अजितदादांसमोर पर्याय तरी काय?

0

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत उभी फुट पडली. त्यानंतर आतापर्यंतच इतिहास उगळायची गरज नाही. महाविकास आघाडीने 400 पारचे स्वप्न भंग केल्याने राजकारणाच्या सारीपाटावर अनेक नेत्यांना नवीन वळण खुणावत आहे. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाला एकच जागा मिळण्याचे रोखठोक उत्तर दिले. गुरुवारी मुंबईत त्यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. त्याला 41 आमदारांपैकी 5 जणांना दांडी मारली. कोणी परदेशी दौऱ्यावर तर इतरांनी वैयक्तिक कारण देत बैठकीकडे पाठ फिरवली. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत अजितदादांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा तोंडावर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला राजकारणात संख्याबळ दाखवावे लागणार आहे.

अधिक वाचा  मागील ३५ वर्ष शरद पवारांच्या पावलावर बारामतीत काम! मी सर्वस्व गमावलं, सुनेत्रावाहिनीची भावनिक साद! डोळ्यात टचकन पाणी

चार जागांपैकी एक जागा

राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीसाठी पाच जागा मिळाल्या होत्या. ऐनवेळी परभणीची जागा मित्र पक्ष रासपचे महादेव जानकर यांना द्यावी लागली. उर्वरीत चार जागांपैकी एकच जाग अजित पवार गटाला खिशात टाकता आली. सुनील तटकरे विजयी झाले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी 10 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. प्रतिष्ठेची करण्यात आलेली बारामतीची जागा सुप्रिया सुळे यांनी जिंकली. या सर्व घडामोडींमुळे अजित पवार गटातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाने पण अनेकांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. एक मोठा गट घरवापसी करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत.

अधिक वाचा  AISCA तर्फे डिजिटल अवेयरनेस कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मोबाईल अ‍ॅपची घोषणा

विधानसभेची चिंता

लोकसभेतील ही खराब कामगिरी अजित पवार गटासाठी चिंतेचा विषय आहे. विधानसभेच्या तोंडावर एक जागा आणि 3.6 टक्के मतदान हा घोर लावणारा विषय आहे. विधानसभेचा रागरंग वेगळा असला तरी महाविकास आघाडीविषयीची सहानुभूतीची लाट ओसरणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभेत शरद पवार गटाला 8 जागा आणि 7 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी काही जण वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अजित पवार गटात खदखद

अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. त्यावेळ अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात येत होता. काही शहरात तर पोस्टर, बॅनर पण लागले होते. त्यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागते, याची आठवण करुन दिली होती. लोकसभेच्या प्रदर्शनानंतर अजित पवार यांना विधानसभेसाठी मोठे संख्याबळ लागणार हे निश्चित आहे. जागा वाटपात लोकसभेसारखी तडजोड करावी लागली तर अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करणार असा प्रश्नही कार्यकर्त्यांना सतावत आहे. सध्या अजित पवार एनडीए सोबत आहे. अर्थात काळाच्या उदरात काय दडलंय हे आताच सांगता येणार नाही.

अधिक वाचा  बागेश्वर बाबांचं थेट मुख्यमंत्री, सरसंघचालक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर वाचाळ वक्तव्य; ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले…