किती जागा लढणार, शिंदे गट बैठकीत हे ठरलं, या पाचही जागा शिवसेनाच लढणार: कीर्तिकर

0

मुंबई : राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 240 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावेळी खळबळ उडाली होती. आता शिंदे गटाची बैठक झाली. त्यात किती जागा लढव्यावा, यासंदर्भात निर्णय झाला आहे.

काय झाला निर्णय

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.

अधिक वाचा  शक्तिपीठ महामार्गात हा बदल निश्चित! या जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितला सविस्तर बदल..

त्या सर्व खासदारांना उमेदवारी

उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन शिंदे गटात सामील झालेल्या तेरा खासदारांची उमेदवारी कायम राहणार आहे. मात्र, उर्वरित पाच जागा आणि इतर चार म्हणजे रायगड, शिरूर, औरंगाबाद आणि अमरावती, ज्या तत्कालीन शिवसेनेने गमावल्या होत्या, त्यावर साहजिकच आमचा दावा असेल, असे कीर्तिकर यांनी सांगितले. बैठकीत 13 पैकी सुमारे 10 खासदार सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीत वाद

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून वाद सुरू आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीमध्ये आपला नैसर्गिक दावा सुनिश्चित करण्यासाठी तयारी केली आहे. त्यावर अजून भाजपकडून काही उत्तर आलेले नाही.

अधिक वाचा  काँग्रेसचा अजातशत्रू नेता सलग 8 टर्म आमदार, राज्यसभेवर? नेमस्त, मुत्सद्दी, अजातशत्रू नेते अशी ओळख हालचालींना वेग, शरद पवारांचं काय?

महाविकास आघाडीचा जागेवाटपाचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. परंतु संजय राऊत यांनी राज्यातील आमचे १८ खासदार असतील, असे स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा आपण घटक पक्ष आहोत. आघाडी मजबूत ठेवायची आहे. पण ते करत असताना तुमची ताकद जास्त असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल, असे अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले होते. त्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. म्हणजेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळी भूमिका जाहीर करत होते.